देश

Atul Londhe : दहशतवादावर नाही, पक्षाला राजकारणाची घाई

Congress : अतुल लोंढेंचा भाजपवर सवालांचा बाण

Author

पहलगाममधील माओवादी हल्ल्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी भाजपवर कठोर शब्दांत टीका केली आहे.

काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू कुटुंबांवर झालेल्या माओवादी हल्ल्याने देशभर संतापाची लाट उसळली आहे. निर्दयपणे करण्यात आलेल्या या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. केंद्र सरकारच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. विरोधकांनी सरकारच्या निष्क्रियतेवर ताशेरे ओढायला सुरुवात केली आहे.

संतापाच्या या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, भाजपचे नेते अंधभक्तांसारखे वागत आहेत. देशाच्या सुरक्षेपेक्षा राजकारणाला अधिक महत्त्व देत आहेत. लोंढे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, देशात संरक्षण सज्जता काँग्रेस सरकारच्या काळात 90 मधील दशकातच झाली होती.

Dudharam Savvalakhe : ईडीच्या धडकेनंतर भाजपमधे पक्षप्रवेश

सरकारवर घणाघाती टीका

अतुल लोंढे म्हणाले की, आज जे जग्वार आणि मिराज सारखे लढाऊ विमाने भारताकडे आहेत, ती काँग्रेस सरकारच्या काळातच विकत घेण्यात आली होती. मोदी सरकारच्या काळात पठाणकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ISI भारतात तपासासाठी बोलावली गेली होती, हे विसरून चालणार नाही. भाजप सरकार पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेण्यात अपयशी ठरले आहे.

अतुल लोंढे पुढे म्हणाले की, आजही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचा “प” सुद्धा उच्चारलेला नाही. कित्येक हल्ले भाजपच्या काळात घडले तरी सत्ताधाऱ्यांचे फक्त निषेधच सुरू आहेत. अशावेळी भाजप की काँग्रेस विरोधात लढायचं की पाकिस्तान विरोधात, हे ठरवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

Waqf Board : धर्म स्वातंत्र्यासाठी मुस्लिम समाज रस्त्यावर

विरोधकांची भूमिका

हल्ल्यानंतर केंद्र सरकारने काही मोठे निर्णय घेतले आहेत. सिंधू जल करार स्थगित करण्यात आला आहे. अटारी-वाघा सीमेवर वाहतूक बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या नागरिकांना SAARC वीजा सवलती नाकारण्यात आल्या आहेत. यासह दिल्लीतील पाक उच्चायुक्तालयातील सल्लागारांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दोन्ही देशांच्या उच्चायुक्तालयांतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली जाणार आहे. पाकिस्तानच्या फ्लाइट्सवर बंदी घालण्यात आली आहे. शेवटी भारत सरकारने पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व प्रकारच्या आयातीवर पूर्ण बंदी घालून मोठा निर्णय घेतला आहे. हे निर्णय राष्ट्रहितासाठी महत्त्वाचे असले तरी, याचा अंमलबजावणीचा फोलपणा विरोधकांच्या टीकेचा विषय ठरतो आहे.

Sudhir Mungantiwar : रेल्वे अतिक्रमणधारकांना हक्काचं घर

राष्ट्रहितासाठी लढण्याचा आग्रह

अतुल लोंढे यांनी सांगितले की, आता वेळ आली आहे की आपण भाजप किंवा काँग्रेस म्हणून नव्हे, तर भारतीय म्हणून एकत्र लढा दिला पाहिजे. अन्यथा आपल्या निष्क्रियतेमुळे देश दुश्मनांच्या हाती जाईल. त्यांनी भावनिक आवाहन करत म्हटले की, आज राजकारणाच्या पलीकडे जाऊन देशासाठी एकजूट होणे गरजेचे आहे.

सध्याच्या घडीला देशासमोरील सुरक्षा आव्हान गंभीर आहे. या संकटाच्या काळात एकत्र येणे आणि राजकारण बाजूला ठेवून राष्ट्रहितासाठी उभे राहणे हीच खरी देशभक्ती असल्याचे अतुल लोंढे यांनी ठामपणे सांगितले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!