महाराष्ट्र

मी दोषी असल्याचे कुठेही नमूद नाही : Anil Deshmukh

Police Department : न्यायमूर्ती चांदीवालांच्या मुलाखतीनंतर दिली प्रतिक्रिया

Author

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात एक प्रकरण गाजत आहे. शंभर कोटी रूपये खंडणी वसुलीचे हे प्रकरण आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना तुरुंगात जावे लागले होते. आता या प्रकरणात पुन्हा नव्याने घडामोडी घडत आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे प्रकरण गाजत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या वसुलीच्या मुद्द्यावरून ऐन निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात गंभीर आरोप केले होते. यासंदर्भात आता चौकशी आयोगाचे प्रमुख चांदीवाल यांनी दिलेल्या मुलाखतीनंतर खळबळ उडाली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Political Earthquake in Politics Of Maharashtra)

अनिल देशमुख म्हणाले की, चांदीवाल यांच्या अहवालात मी दोषी असल्याचे कुठेही नमूद करण्यात आलेले नाही. चांदीवाल यांनी माझ्याविरोधात ११ महिने चौकशी केली. चौकशी सुरू असताना चांदीवाल यांनी अनेक अधिकाऱ्यांचे बयाण नोंदवले. बयाण नोंदणी, पुरावे गोळा करणे असा क्रम सुरू होता. चौकशी पूर्ण झाल्यानंतर चांदीवाल यांनी अहवाल तयार केला. मात्र या अहवालात अनिल देशमुख हे दोषी आहेत, असे कुठेही म्हणण्यात आलेले नाही. आरोपांची सुमारे ११ महिले चौकशी सुरू होती. चांदीवाल आयोगाना अहवाल कुठे गेला असा प्रश्नही देशमुख यांनी केला आहे. न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाच्या अहवालात आपण दोषी असल्याचे म्हटले असेल तर दाखवून द्या, असेही ते म्हणाले.

CP परमवीर सिंह गायब

आपल्या विरोधात मुंबईचे त्यावेळचे CP परमवीर सिंह यांनी आरोप केले होते. पण परमवीर सिंह शेवटपर्यंत आयोगाच्या समोर आलेच नाहीत. आयोगाने त्यांना समन्स पाठविले. अटक वॉरंटही काढला. तरीही सिंह यांनी पुरावे का दिले नाही, असा प्रश्न देशमुख यांनी उपस्थित केला. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या विरोधात कोणताही पुरावा मिळाला नाही, असे चांदीवाल यांनी अहवालात म्हटले आहे, असा दावा देशमुख यांनी केला.

माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांना एकदा दोनदा नव्हे तर तब्बल सहा वेळा समन्स बजावण्यात आले होते. आयोगाने चौकशीसाठी बोलाविले होते. आपल्या विरोधात ठोस पुरावे होते तर कोणीही ते चांदीवाल आयोगापुढे का दिले नाही, असे देशमुख म्हणाले. आपल्याकडे कोणतेही पुरावे नाही, असे सगळ्यात पोलिस अधिकाऱ्यांनी चांदीवाल आयोगाला सांगितले, असे देशमुख यांनी सांगितले. पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी स्पष्ट बयाण दिले आहे. अनिल देशमुख यांनी आपल्याला कधीही बार मालकांकडून खंडगी मागण्यासाठी सांगितले नाही, असे वाझे यांनी आधीच सांगितले आहे, असा दावा देशमुख यांनी केला.भाजपकडून हा अहवाल दाबण्यात आला आहे. आपण सतत चांदीवाल आयोगाचा अहवाल जाहीर करा, अशी मागणी करीत आहोत. दीड वर्षांपासून आपला हा लढा सुरू आहे. भाजप सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. आयोगाच्या अहवालासाठी आपण सतत आक्रमक आहोत. तरीही सरकार अहवाल का जनतेपुढे आणत नाही, असा सवालही देशमुख यांनी केला.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!