
भंडारा-पवनी विधानसभा मतदार क्षेत्रात काँग्रेस निवडणूक लढवित आहे. पण काँग्रेस प्रचाराच्या संदर्भात स्पीड पकडेनाशी झाली आहे. काँग्रेसचा Over Confidence आणि नेत्यांचे दुर्लक्ष काँग्रेसला गोत्यात आणण्याची शक्यता आहे.
Bhandara District : भंडारा-पवनी मतदारसंघ आपला गड आहे. विजय निश्चित आहे. या अविर्भावात असलेले काँग्रेसच्या उमेदवाराला यंदाच्या निवडणुकीत गाफिल राहणे भारी पडू शकते. काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचाराकडे मोठ्या नेत्यांनी पाठ फिरविली आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या प्रचाराबाबत टाळाटाळ केली जात आहे. या प्रकार काँग्रेसच्या उमेदवारासाठी अडचणीचा ठरू शकतो. त्यातही प्रचाराची धुरा केवळ एका माजी राज्यमंत्र्याच्या हाती देण्यात आली आहे. Congress Candidate in Bhandara in major trouble.
माजी राज्यमंत्री सोडून इतर नेते गायब आहेत. ही गोष्ट संशय निर्माण करणारी ठरली आहे. ही बाब लक्षात घेता ‘कुछ तो गडबड है या!’ असे म्हणण्याची वेळ काँग्रेस उमेदवारांवर आली आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे लक्ष सध्या गोंदिया जिल्ह्यात आहे. हे लक्ष केवळ आणि केवळ एका उमेदवाराभोवती आहे. हे उमेदवार आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. नाना पटोले यांच्या साकोली विधानसभा क्षेत्रात हे लक्ष केंद्रित झाले आहे. त्यातही गोंदियात काँग्रेस उमेदवार रग्गड असल्याने वरिष्ठ नेते भंडारा-पवनी मतदारसंघ विसरले आहेत.

माजी मंत्री मैदानात!
सध्या काँग्रेसचे सगळेच नेते गोंदिया, साकोली मतदारसंघावर लक्ष लावून आहेत. भंडारा-पवनी मतदारसंघात प्रचार केवळ तरूणांवर केंद्रित झाला आहे. तरुण प्रचाराची भीस्त लढवत आहेत. गल्लीतील नेत्यांव्यतिरिक्त जिल्ह्यातील, राज्यातील मोठी नेतेमंडळी या मतदारसंघात फिरकलेली नाही. हेच चित्र दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेसकडून जुनी व्होटबँक काबिज करण्यासाठी विशेष असे प्रयत्न होताना दिसत नाहीत. प्रचाराला प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती काँग्रेस उमेदवारांचा डोळ्यांत अंजन टाकणारी आहे.
या सर्व घडामोडीत भंडारा-पवनीच्या प्रचाराची पूर्ण धुरा एका माजी मंत्र्यावर देण्यात आली आहे. या मंत्र्याच्या पवनी क्षेत्रात प्रभाव असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मागील विधानसभा निवडणुकीत या माजी मंत्र्याची जादू काँग्रेस समर्पित उमेदवाराला प्रभावी ठरली नाही. त्यामुळे यंदा तो माजी मंत्री प्रभावी ठरणार असे वाटत नसल्याचे जाणकार सांगतात.
नानांचे नेटवर्क व्यस्त
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील या विधानसभेबाबत पाहिजे त्याप्रमाणात अद्याप सिरीयस झालेले नाही. उमेदवारी अर्ज भरताना स्वत: उपस्थित राहून नाना पटोले यांनी भंडारा-पवनीची लढत प्रतिष्ठेची केली. सुरुवातीला असे वाटत होते. मात्र अचानक या मतदारसंघाकडे नाना पटोले यांनी दुर्लक्ष करत गायब राहणे उमेदवाराची चिंता वाढविणारी आहे. त्यामुळे नाना पटोले यांचे गायब राहणे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पाठ फिरविणे भंडारा-पवनी मतदार संघात काँग्रेसला भारी पडणार आहे.