महाराष्ट्र

नागरीकांना मिळणार घरबसल्या Service 

मुख्मंत्री Devendra Fadnavis यांनी दिले निर्देश 

Author

राज्यातील जनतेच्या सोईसाठी जास्तीत जास्त सेवा ऑनलाइन पद्धतीने पुरविण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले महत्त्वाचे निर्देश.

महाराष्ट्रातील जनतेला घरबसल्या शासकीय सेवांचा लाभ घेता आला पाहिजे. राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलद्वारे किंवा ऑनलाइनमाध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजे. याकरिता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची ऑनलाईन प्रणाली विकसीत करण्याच्या सूचना फडणवीस यांनी दिल्या आहेत. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यातील विविध विभागांतील 996 सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी “आपले सरकार” या पोर्टलवर 536 सेवा नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. 90 सेवा संबंधित विभागांच्या पोर्टल वर उपलब्ध आहेत. मात्र 343 सेवा नागरिकांना ऑफलाईन पध्दतीने देण्यात येतात. आता या सर्वच सेवा “आपले सरकार” पोर्टलवर उपलब्ध कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.

दोन दिग्गज Leaders मुळे धावपट्टीचे काम होणार पूर्ण ?

99 Percent सेवा ऑनलाइन माध्यमातून

सद्ध्या ऑफलाईन पध्दतीने ज्या सेवा दिल्या जात आहे. त्या सर्व सेवा ऑनलाईन करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाकडून पुढाकार घेण्यात यावा. आगामी शंभर दिवसात हे काम पूर्ण करावे. ज्या सेवा अधिसूचित करण्यात आलेल्या नाहीत. त्या सर्व सेवा अधिसूचित करण्यासाठी संबंधित सचिव आणि मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा. 99 टक्के शासकीय सेवा नागरिकांना मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजे. यामुळे नागरिकांना सोईस्कर होणार. नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार जाण्याची गरज पडणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या विषयावर देखील या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. केस गळती झालेल्या लोकांच्या अन्न आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. सकृतदर्शनी हा प्रकार बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होत असल्याचे निदर्शनास येत आहे. केस गळती झालेल्या नागरिकांना औषधे आणि मलम वितरित करण्यात आले आहेत. त्यामुळे केस गळतीचे प्रमाण आता कमी झाले असल्याचे स्पष्ट होत आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

राज्यातील अशा प्रकारांबाबत आरोग्य विभागाने नेहमी सतर्क राहिले पाहिजे. तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या पाहिजे. अशा प्रकारच्या घटना वर्धा जिल्ह्यातही आढळून येत आहेत. त्याकडेही लक्ष द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!