महाराष्ट्र

Chhatrapati Shivaji Maharaj : सत्ताधाऱ्यांचे कथित खास कोरटकर अडचणीत

Supreme Court Of India : पोलिसांचा थेट घाव, राजकीय वातावरण तापले

Author

राजकीय वादळ अधिक तीव्र झाले आहे. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे प्रशांत कोरटकर अडचणीत सापडले असून, त्यांच्या जामिनाविरोधात कोल्हापूर पोलिसांनी थेट हायकोर्टात धाव घेतली आहे.

राज्याच्या राजकारणात भूकंप झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप असलेल्या कोरटकर यांच्या अटकेसाठी कोल्हापूर पोलिसांनी थेट बॉम्बे हायकोर्टात धाव घेतली आहे.

राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप असलेल्या कोरटकर यांनी आपल्या विधानांवर माफी मागण्याऐवजी आक्रमक पवित्रा घेतला. मात्र, त्यांच्या विरोधात नोंद झालेल्या गुन्ह्यामुळे राज्यात तणाव निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांचे विश्वासू समजले जाणारे कोरटकर यांना वाचवण्यासाठी काही शक्ती कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात असतानाच कोल्हापूर पोलिसांनी त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Raj Thackeray : मनसेच्या मुख्य ‘इंजिन’ चालकाकडून भैय्याजींबाबत ‘चेन पुलिंग’

सरकारवर संशयाचे ढग

कोल्हापूरच्या जूना राजवाडा पोलीस ठाण्यात कोरटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यासाठी पोलीस नागपूरमध्ये दाखल झाले होते. मात्र, काही पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने कोरटकर फरार झाल्याची जोरदार चर्चा आहे. कोल्हापूर पोलिसांना कोरटकर यांच्या अटकेसाठी मोठी कसरत करावी लागली, परंतु ते रिकाम्या हाताने परतले. दरम्यान, कोरटकर यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात जाऊन स्वतःच्या जीवाला धोका असल्याचा आरोप केला, त्यानंतर हा संपूर्ण मामला अधिकच पेचप्रसंगात सापडला. विरोधकांनी सरकारवर पोलिसांवर दबाव टाकून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

सत्ताधारी पक्ष अडचणीत

संपूर्ण प्रकरणामुळे सत्ताधारी पक्षावर जबरदस्त टीका होत आहे. कोरटकर यांच्या समर्थनार्थ काही नेते समोर येत असतानाच, विरोधकांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेत सरकारला धारेवर धरले आहे. यापूर्वीही कोरटकर यांच्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यात संतापाची लाट उसळली होती, मात्र यावेळी परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.सरकारच्या गुप्त पाठिंब्यामुळेच कोरटकर सुटले असल्याचा आरोप होत असतानाच, विरोधकांनी यावरून मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले असून, पुढील काही दिवस सरकारला या वादळाचा सामना करावा लागणार आहे.

Beed : धनंजय मुंडेंच्या सोबतचा ‘हा’ तरुण कोण…

सोशल मीडियावर भडका

झालेल्या प्रकरणावरून कोरटकर समर्थक आणि विरोधक रस्त्यावर उतरले आहेत. कोल्हापूर, नागपूर आणि पुण्यात आंदोलन पेटले आहे. अनेक ठिकाणी कोरटकर समर्थकांनी निषेध नोंदवला, तर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत, सरकारला जाब विचारला.सोशल मीडियावरही या प्रकरणाने आग लावली आहे. कोरटकर यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात जोरदार ट्रेंड सुरू झाले असून, काहींनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. दुसरीकडे, सत्ताधारी पक्षाने मात्र यावर मौन बाळगले आहे, त्यामुळे सरकारची गोची झाली आहे.

हायकोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

 

बॉम्बे हायकोर्टात दाखल झालेल्या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार असून, त्यानंतर पुढील राजकीय समीकरणे ठरतील. सरकार कोरटकरला वाचवते की कायदेशीर कारवाईला संमती देते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या प्रकरणामुळे येत्या निवडणुकीत मोठे परिणाम होण्याची शक्यता आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!