
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आषाढी वारी आणि नमाज संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याने महाराष्ट्रात नव्या धार्मिक तणावाची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रात धर्माच्या नावावरून होणारे राजकारण काही नवीन नाही. पण ते नेहमीच राज्यातील सामाजिक तणावाला भडकवणारे ठरतात. नागपूरमध्ये गेल्या काही महिन्यांत झालेल्या दंगली आणि वादग्रस्त घटनांनी हा मुद्दा पुन्हा एकदा तापलेला दिसतोय. 17 मार्च रोजी औरंगझेबाच्या मुद्द्यावरून नागपूर परिसरात घडलेली दंगल अजूनही थंडावलेली नाही. मात्र सध्या आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा धर्माच्या नावावरून राजकारण सुरू झाल्याचे चित्र समोर येत आहे. नागपूरमध्ये असलेले हे राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा प्रज्वलित करण्यामागे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचे वक्तव्य कारणीभूत ठरले आहे.
आषाढी एकादशी यात्रेच्या संदर्भात त्यांनी केलेले वादग्रस्त विधान सध्या राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वारी संदर्भातील वक्तव्यात काही अशा बाबी मांडल्या ज्या अल्पसंख्यांकांमध्ये तणाव निर्माण करणाऱ्या आहेत. खासकरून त्यांनी मुस्लिम समाजाच्या नमाज पठणा संदर्भात केलेल्या टीकेमुळे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी तातडीने प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अबू आझमींना सेक्शन 10 अंतर्गत नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला आहे. गरज पडल्यास आयोगासमोर उपस्थित होण्यासही सांगितले आहे.

सामाजिक तणावाचा उलगडा
प्यारे खान यांनी स्पष्टपणे म्हटले की, जर काही जण धर्माच्या नावावर भांडणे करणार असतील, तर पोलिसांकडे तक्रार करावी आणि कायदेशीर कारवाई होईल. अल्पसंख्याक आयोगाचा हा कडक निर्णय आता राज्यातील राजकीय वादळ आणखी मोठे करू शकतो. अबू आझमी म्हणतात की, मुस्लिम समाजाने कधीही रस्त्यावर उत्सव किंवा धार्मिक विधी करताना तक्रार केली नाही. पण नमाज पठणासाठी जेव्हा काही वेळा रस्त्यावर थोडा काळ जातो, तेव्हा यावर तक्रार होते. याचा अर्थ काही लोक मुद्दाम मुस्लिम समाजाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या वक्तव्याने राज्यात पुन्हा एकदा धर्माधारित विवादाला उभारी मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
शिवाय, आझमी यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावरही निशाणा साधला आहे. त्यांना चार फुटाचा माणूस म्हणत, त्यांच्या लायकीवर सवाल उपस्थित केला. हा राजकीय वाद महाराष्ट्रात पुन्हा धर्माच्या नावावरून दंगली होण्याचा भितीदायक प्रश्न उपस्थित करत आहे. राजकारण आणि धर्माचा या वेळी ज्या थरकापी वळणावर सामना झाला आहे. त्यातून स्पष्ट होते की, सामाजिक शांततेसाठी आणि विकासासाठी धार्मिक सौहार्द आवश्यक आहे. पण हे राजकारणाचे रंगमंच अशा वादग्रस्त वक्तव्यांनी आणि तणाव निर्माण करणाऱ्या कृतींनी वारंवार भडकतेय. पुढील काळात यामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणावर कसा परिणाम होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Nag River : पावसाचं धरण फुटायच्या आधीच नागपूर बुडण्याच्या उंबरठ्यावर