
कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीवर केलेल्या वादग्रस्त विधानावर शेतकरी संघटना आणि विरोधकांनी जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्रातील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यात चर्चा रंगली आहे. नुकताच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना, त्यांनी हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? असे खळबळजनक वक्तव्य केले. या विधानामुळे शेतकऱ्यांच्या भावना बळकट झाल्या असून, विरोधकांनीही यावर गंभीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मागील आठवडाभर जोरदार पावसाने महाराष्ट्रात अनेक भागांतील शेतकरी संकटात सापडले आहेत.
कांदा, आंबा, भुईमुगाच्या शेंगा यांसारख्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातले काम चुकवून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती चिंतेची आहे. अशा कठीण प्रसंगात कृषिमंत्रींचे असं वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांच्या भावनांवर अजून फटकेबाजी करण्यासारखं ठरलं आहे.नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या पांढुर्ली गावात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या कोकाटे यांनी पत्रकारांशी बोलताना वरील वादग्रस्त विधान केले. त्या भागात कांदा, द्राक्षे आणि इतर महत्त्वाच्या पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

Yavatmal : थेंब थेंब पाण्याचे स्वप्न अन् रखडलेल्या कामांची वाळवंटे
संयम तुटण्याची भीती
अशी परिस्थिती असताना कृषिमंत्री यांचा हा विनोदात्मक किंवा तिरकस शब्दांतून केलेला उल्लेख शेतकऱ्यांच्या सहनशीलतेला आव्हान ठरला आहे.शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांचे लक्ष वेधून घेतलेले हे विधान, शेतकऱ्यांच्या मनातील संताप वाढवण्याचे काम करत आहे. यामुळे आता या मुद्द्यावर विरोधकांकडून कडवट हल्लाबोल होण्याची शक्यता अधिकच वाढली आहे.शेतकरी संघटनेचे मंत्री रविकांत तुपकर यांनी कोकाटे यांच्या वक्तव्यावर कठोर टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या संकटावर सरकारमधील मंत्री जखमेवर मीठ चोळत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
तुपकर म्हणाले, संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी, सरकारचे काही मंत्री अशा वक्तव्यांनी शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. शेतकऱ्यांचा संयम तुटण्याची वेळ येऊ नये, अशी आम्ही अपेक्षा करतो.अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर मोठा फटका बसला आहे. सोयाबीन, कापूस, कांदा यासह अनेक पिकांना बाजारभावही चांगले नाहीत. अशा वेळी सरकारने शेतकऱ्यांना योग्य वेळेत मदत करणे आवश्यक असते. मात्र त्याऐवजी भिकारी म्हणणे, कर्जमाफीवर टीका करणे आणि आता पंचनाम्यांविषयीचं अशा प्रकारचं वक्तव्य यामुळे शेतकरी नाराज आहेत.शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे की, जर मदत करता येत नसेल तर किमान अशा बेताल वक्तव्यांनी शेतकऱ्यांच्या मनाला दुखावू नये. आता आमच्या संयमाचा बांध तुटण्याची वेळ आली आहे. सरकारने या बाबतीत गांभीर्याने विचार करायला हवा.