
मुंबई विधान भवनात अर्थसंकल्पीय सत्राच्या पहिल्याच क्षणी अजित पवारांच्या “पुन्हा आलो, पुन्हा आलो” या कवितेने राजकीय वातावरण ढवळून निघाले. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींची नांदी सुरू झाली आहे.
मुंबई विधान भवनात 2025-26 चा अर्थसंकल्प सादर होत असताना राज्याच्या राजकारणात एक नवा नाट्यपूर्ण क्षण पाहायला मिळाला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी “पुन्हा आलो, पुन्हा आलो, पुन्हा आलो!” अशी कविता सादर करत अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात केली. त्यांच्या या कवितेने संपूर्ण सभागृहात नवा जोश निर्माण केला, तर बाहेर राजकीय चर्चांना उधाण आले. फडणवीस यांनी पूर्वी ‘पुन्हा येईन’ असे म्हणत राजकीय वातावरण तापवले होते, आणि आता अजित पवार यांनी ‘पुन्हा आलो’ म्हणत सत्तेत आपली मजबूत पकड असल्याचे दाखवून दिले.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची नवी गट्टी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत होती. आता त्याचीच प्रचिती अर्थसंकल्पीय अधिवेशनात आली. महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही, असे सांगत अजित पवार यांनी भव्य घोषणा करण्याचे संकेत दिले. त्यांच्या हातातील बजेट फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारसाठीही महत्त्वाचे ठरणार आहे. दरवर्षी गुलाबी रंगाचे जॅकेट घालणारे अजित पवार या वेळी राखाडी जॅकेटमध्ये दिसले, जणू काही महाराष्ट्राच्या अर्थकारणाला नवे रूप देण्याच्या तयारीत आहेत.

Ajit Pawar : ना एक मिनिट पुढे, ना मागे; दादांचा ‘परफेक्ट टाइमिंग’
महाराष्ट्राच्या प्रगतीचा रोडमॅप
मुंबई विधान भवनात 2025-26 चे अर्थसंकल्पीय सत्र सुरू असताना, एकीकडे विधान परिषदेत आशिष जयस्वाल आपली भूमिका मांडत होते, तर दुसरीकडे अजित पवार विधी मंडळात महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करत होते. ‘पुन्हा आलो’ ही कविता म्हणजे केवळ एक भावनिक वाक्य नसून, विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात असल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. या अर्थसंकल्पात विविध नवीन योजना आणि मोठ्या घोषणा होणार असल्याची चर्चा आधीपासूनच होती. आता महाराष्ट्राच्या विकासाचा नवा रोडमॅप तयार करण्यासाठी अजित पवार काय करणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील प्रकल्प, शेती क्षेत्रातील गुंतवणूक, पायाभूत सुविधा आणि औद्योगिक प्रगती यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
सत्ता समीकरणांमध्ये संकेत
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळीक चर्चेचा विषय बनली होती. अर्थसंकल्पीय सत्रातही या दोघांमध्ये समन्वय दिसून आला, ज्यामुळे महाराष्ट्राच्या सत्तासमीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही, असे म्हणत अजित पवार यांनी विकासाच्या गतीला नवी दिशा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात मोठे भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोठ्या घोषणा, बदलते राजकीय समीकरण आणि विकासाचा नवा अजेंडा म्हणजेच महाराष्ट्र आता मोठ्या घडामोडींसाठी तयार आहे.