विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बरीच उलथापालथ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेत्यांची बैठक घेतली.
राज्यातील महायुती सरकारमध्ये अंतर्गत कलह सुरू होताना दिसत आहे. अजित पवार यांनी मंगळवार, 14 जानेवारी रोजी रात्री राष्ट्रवादीच्या आमदारांसह त्यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांचे निर्णय मुख्यमंत्र्यांनी चर्चेविना फेटाळून लावल्याने अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खाते तर बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार खाते आहे. या दोन्ही मंत्र्यांनी आपापल्या विभागांबाबत काही निर्णय घेतले. जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे ढकलले. याबाबत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
उपमुख्यमंत्र्यांची Tweet
याबाबत अजित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली. बैठकीची छायाचित्रे शेअर करताना अजित पवार यांनी लिहिले की, काल रात्री माझी देवगिरी येथील निवासस्थानी राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली, राज्यातील समस्या आणि पक्षाच्या भवितव्यावरही चर्चा झाली.
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1879386939109093711?t=s5cbxtpp89MQt7UjHte92g&s=08
अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत महायुतीत राहायचे असेल तर कुठेतरी समन्वय राखावा लागेल, असे म्हटल्याची माहिती आहे. भविष्यात महायुती म्हणून पुढे जाण्याचे नियोजन असेल, तर समन्वय आवश्यक आहे. अशा परिस्थितीत निर्णय रद्द करण्याचा निर्णयही चर्चेनंतरच घ्यावा, अशी इच्छा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होता न आल्याने नाराजीच्या चर्चा काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर जी बैठक झाली त्या बैठकीतला त्यांचा हास्य लोप पावलेला चेहराही बरंच काही सांगून जात होता.
गेल्या वर्षी 5 डिसेंबरच्या रोजी अमित शाह यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते उपमुख्यमंत्री व्हायला तयार झाले, अशाही राजकीय चर्चा रंगल्या. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट ही काही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला रुचल्याचं दिसत नाही. महायुतीत वादाची ठिणगी पडण्यासाठी हे कारण पुरेसं ठरणार का? की आणखी काही वाद महायुतीत उफाळून येतो, हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक महत्वाची मानली जात आहे. पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना महायुतीचा धर्म पाळण्याची सूचना बैठकीत केली. सत्ता स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्वच मंत्र्यांनी पदभार स्वीकारला आहे.
