
सीमेवर सैनिकांच्या मनोबलात नवचैतन्य फुंकत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभक्तीचा धगधगता संदेश दिला. 56 मुद्द्यांच्या माध्यमातून भारताची ठाम भूमिका जगासमोर प्रभावीपणे मांडली.
देशाच्या राजकारणात आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये ऐतिहासिक पाऊल टाकत, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा देशाला त्यांच्या ठाम नेतृत्वाची जाणीव करून दिली आहे. पाकिस्तानच्या कुरापतींना स्पष्ट आणि ठाम प्रत्युत्तर देताना, त्यांनी 56 मुद्द्यांच्या माध्यमातून देशाची भूमिका संपूर्ण जगासमोर मांडली. थेट सीमेवर जाऊन आपल्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी करणारे मोदी एकमेव नेतृत्व आहे. एक अशी परंपरा जी ते गेल्या 12 वर्षांपासून प्रामाणिकपणे पाळत आहेत.
अकोल्याचे भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, पंतप्रधान मोदींनी केवळ भारताची रणनीती स्पष्ट केली नाही, तर सैनिकांमध्ये नवचैतन्य फुंकून देशभक्तीचा नवा ध्यास निर्माण केला. पाकिस्तानच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी शांततेतून शक्ती आणि नीतिमत्तेतून पराक्रम यांचा संदेश दिला. मोदींच्या या भाषणात संरक्षण, परराष्ट्र नीति, स्वावलंबन, तंत्रज्ञान, सीमासुरक्षा, काश्मीरची स्थिती, आणि जागतिक धोरण यांचा समावेश होता. प्रत्येक मुद्दा हा योजनाबद्ध, देशहिताची जाणीव ठेवून मांडलेला होता. विशेषतः पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेवर त्यांनी जोरदार हल्लाबोल करत भारताची शांततेतील ताकद दाखवून दिली. यामुळेच भारताचा आवाज आता केवळ सीमाभागातच नव्हे, तर संपूर्ण जागतिक व्यासपीठावर स्पष्ट ऐकू येतो आहे.

एक अनोखी प्रेरणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील एकमेव असे नेते आहेत, जे दरवर्षी सैनिकांसोबत प्रत्यक्ष दिवाळी साजरी करतात, असे गौरवोद्गार आमदार सावरकर यांनी काढले. हे केवळ एक प्रतीकात्मक पाऊल नाही. सैनिकांचा मनोबल वाढवण्याचा, त्यांच्या त्यागाचा सन्मान करण्याचा आणि जनतेच्या मनात देशसेवेसाठी आदर निर्माण करण्याचा एक प्रेरणादायी उपक्रम आहे. याच पार्श्वभूमीवर अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनुप धोत्रे यांनी 17 लाख मतदारांच्या वतीने पंतप्रधानांचे अभिनंदन करत आभार मानले. जनता जनार्दन मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्यामागे खंबीरपणे उभी आहे. आमच्या वतीने आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. त्यांचे नेतृत्व देशासाठी प्रेरणादायक असल्याचे नम्रपणे सांगतो, असे त्यांनी म्हटले.
भारत ठाम
या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट स्पष्ट आहे. भारत आता रक्षणात्मक भूमिकेत नव्हे, तर स्पष्ट, सशक्त आणि जागतिक पातळीवर जबाबदारीने निर्णय घेणाऱ्या देशांच्या अग्रभागी उभा आहे. मोदींचे नेतृत्व हे केवळ राजकीय नाही, तर भावनिक, सामरिक आणि राष्ट्रीय गर्वाचा स्रोत बनले आहे. पंतप्रधान मोदींच्या या संवादातून आणि कृतीतून केवळ सरकारची नीती स्पष्ट होत नाही, तर जनतेचा आत्मविश्वासही दृढ होतो. अकोल्याच्या जनतेने यावर एकमताने कृतज्ञता व्यक्त करत, राष्ट्रीय एकात्मता आणि सैनिकांच्या समर्थनात आपली भूमिका ठामपणे मांडली आहे.