
महाराष्ट्र सरकारने अकोला जिल्ह्यात सोयाबीन खरेदीसाठी दोन लाख क्विंटलची वाढीव मंजुरी दिली आहे. भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रयत्नांमुळं हे शक्य झालं आहे.
अकोला जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची वार्ता सरकारनं दिली आहे. भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळं सरकारनं सोयाबीन खरेदीसाठी एक लाख क्विंटलचा वाढीव लक्षांक मंजूर केला आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांची उत्पादीत केलेली सोयाबीन सरकारी खरेदी योजनेअंतर्गत विकता येईल. सरकारच्या या निर्णयामुळं बळीराजाला मोठा आधार मिळणार आहे. भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांच्या हक्काची ही लढाई लढली होती.
शेतकऱ्यांनी काळजी करू नये. महायुती सरकार त्यांच्या पाठिशी आहे, असा धीर त्यांनी बळीराजाला दिला होता. सरकारनं शेतकऱ्यांकडून सर्व सोयाबीन खरेदी करावी, अशी मागणी त्यांनी वेळोवेळी लावून धरली. आता सरकारच्या या निर्णयामुळं अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाढीव लक्षांक मंजुरीच्या मागणीसाठी रणधीर सावरकर यांनी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडं पाठपुरावा केला. पणन मंत्र्यांनी याबाबत सूचना द्यानी, अशी मागणी त्यांनी केली होती.

पणन मंत्र्यांची सकारात्मकता
आमदार रणधीर सावरकर यांनी शेतकऱ्यांची व्यथा पणन मंत्र्यांकडं मांडली. त्याची रावल यांनी गंभीर दखल घेतली. सोयाबीन खरेदीबाबत त्यांनी सकारात्मकक दर्शवली होती. रावल यांनी आमदार सावरकर यांना विश्वास दिला की, शेतकऱ्यांचे कल्याण हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यानंतर रावल यांनी तातडीनं निर्णय घेत सोयाबीन खरेदीचा लक्षांक वाढवून दिला. अकोला जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. शेतकऱ्यांना सरकारकडून योग्य दराने विक्रीची सुविधा मिळवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत आमदार सावरकर म्हणाले, सरकारनं सर्व शेतकऱ्यांच्या उत्पादीत सोयाबीनची खरेदी करून त्यांना दिलासा दिला आहे.
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी फेब्रुवारी 2025 अखेरपर्यंत सोयाबीन खरेदीची मुदत वाढवून द्यावी, अशी पुनः मागणी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक काळ मिळे. त्यांच्या मेहनतीला अधिक किंमत मिळेल, असे सावरकर यांचे मत आहे. राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आमदार सावरकर यांना दिलेले आश्वासन महत्त्वाचे ठरले आहे.
अकोला जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी अधिकाधिक खरेदी उद्दिष्ट मंजूर केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे आणि या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांसाठी हे एक मोठे यश मानले जात आहे, कारण त्यांची मेहनत आणि संघर्ष सरकारने मान्य केले आहे. या निर्णयामुळे अकोला जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या मेहनतीचा प्रतिफळ मिळवण्याची संधी मिळेल.