देश

Operation Sindoor : अनिल देशमुख यांनी वाढदिवस केला राष्ट्राला अर्पण

Anil Deshmukh : नेत्याचा विचार समाजाला स्पर्श करणारा

Author

देशाच्या काळजाला चिरत जाणारा पहलगाममधील दहशतवादी हल्ला संपूर्ण भारताला हादरवून गेला. अशा काळात, नेते अनिल देशमुख यांनी जल्लोष नाकारत संवेदनशीलतेचा आदर्श उभा केला आहे.

जम्मू-काश्मीरमधील निसर्गरम्य पहलगाम… डोंगररांगांच्या कुशीत वसलेले हे स्वर्गसमान स्थळ, शांततेचं प्रतीक मानलं जातं. पण नुकत्याच एका भीषण आणि अमानुष दहशतवादी हल्ल्याने या नंदनवनाची शांतता चिरडून टाकली. 26 निष्पाप नागरिकांचे प्राण घेणारा हा हल्ला केवळ एक हिंसक कारस्थान नव्हते, तर तो देशाच्या आत्म्यालाच घायाळ करणारा होता. संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. प्रत्येक नागरिकाच्या मनात एकच भावना, हळहळ, शोक, आणि कठोर प्रतिकार.

भारतीय सेनेनेही याला सडेतोड उत्तर देत ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून अतिरेक्यांवर कठोर कारवाई सुरू केली आहे. शांततेच्या मुखवट्यामागे लपलेल्या हिंसक छायांना उघडं पाडण्याचं आणि कायमचं नष्ट करण्याचं काम सुरू आहे. सीमारेषेपासून दिल्लीपर्यंत, सोशल मीडियापासून गावकुसापर्यंत एकच सूर.. “आता पुरे!” अशा संवेदनशील आणि भावनिक क्षणी, देशातील नेतेमंडळींनीही जबाबदारीची जाणीव ठेवत सामाजिक एकोपा आणि राष्ट्रभक्तीचं दर्शन घडवलं आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी घेतलेला निर्णय सध्या सर्वत्र कौतुकाचं आणि आदर्शवत ठरत आहे.

Environmental Crisis: झाडांची कत्तल म्हणजे पर्यावरणाचा खून

देशासाठी एकत्र

सामान्यतः राजकीय नेत्यांचे वाढदिवस म्हणजे फ्लेक्स, होर्डिंग्ज, जाहिराती, ढोल-ताशांचा गजर आणि जयजयकाराचा जल्लोष. पण यावर्षी अनिल देशमुख यांनी यापेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना स्पष्ट आवाहन केलं आहे. ‘सध्याच्या अशांत वातावरणात, देशावर झालेल्या जखमा ताज्या असताना कोणताही उत्सव साजरा करणं हे माझ्या मनाला पटत नाही. त्यामुळे कृपया कुणीही फ्लेक्स, होर्डिंग्ज किंवा जाहिराती लावू नये. वाढदिवस साजरा न करता, या वेळेस आपण देशासाठी एकत्र प्रार्थना करूया,’ अशी भावना अनिल देशमुख यांनी व्यक्त केली.

हा निर्णय नुसता औपचारिक नव्हता. तो त्यांच्या संवेदनशीलतेचा आणि राष्ट्रप्रेमाचा चेहरा दाखवणाराही होता. अनिल देशमुख यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांशी एक विशेष संवाद साधत सांगितलं, की आपल्या सहकार्यामुळे आणि पाठबळामुळेच आज मी इथपर्यंत आलो आहे. पण आज देशावर संकट आहे. अशा वेळी व्यक्तिगत गोष्टींपेक्षा राष्ट्र महत्त्वाचं.

Shiv Sena : युतीचा धर्मही जपणार, पण स्वबळाची धारही ठेवणार

जबाबदारीची जाणीव

अनिल देशमुख यांचा हा संयम आणि परिपक्वतेचा निर्णय सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक सामाजिक संघटना, कार्यकर्ते, आणि सामान्य नागरिक यावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. हा प्रसंग फक्त एक नेता आणि त्याचा वाढदिवस इतकाच मर्यादित नाही, तर तो आपल्याला हे शिकवतो की, सार्वजनिक आयुष्यातील संवेदनशीलता आणि जबाबदारी कशी असावी. अशा बिकट प्रसंगी जेव्हा काही जण राजकारणाच्या पोळ्या भाजत असतात, तेव्हा काही नेत्यांचा संयमी आणि प्रगल्भ निर्णय खरंच प्रेरणादायी आहे.

आज देशाला अशाच जबाबदार, संवेदनशील आणि दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाची गरज आहे. जी केवळ सत्ता आणि प्रसिद्धीसाठी नव्हे, तर देशाच्या भावना ओळखून कृती करू शकेल. अनिल देशमुख यांची ही भूमिका भविष्यातील नेत्यांसाठी एक मार्गदर्शक ठरू शकते.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!