
पहलगाम दहशतवादी हल्ल्याने देशभरात चिंता निर्माण झाली आहे. या हल्ल्यावर अनिल देशमुख यांनी चौकशीअंती सत्य समोर येईल असे मत व्यक्त केले आहे.
दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम परिसरात घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. बईसरण खोऱ्यात दुपारी झालेल्या या गोळीबारात दहशतवाद्यांनी धर्म विचारून अंदाजाने हल्ला केल्याचे आरोप आता पुढे आले आहेत. या घटनेनंतर राज्यातील आणि देशातील राजकीय वातावरणही चिघळले आहे. यात आतापर्यंत 26 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. काही पर्यटक अजूनही अडकलेले आहेत.
हल्ल्यानंतर काही माध्यमांनी दावा केला की, दहशतवाद्यांनी गोळीबार करण्याआधी पीडितांचा धर्म विचारला होता. या दाव्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी संयमी आणि जबाबदार प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, यावर कोणतीही खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. चौकशी पूर्ण झाल्यावरच सत्य बाहेर येईल.

पाकिस्तानवर कारवाईचा वर्षाव
हल्ल्यात माओवाद्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेत फक्त हिंदू धर्मीयांनाच लक्ष्य केले गेले, असे काही माध्यमांनी म्हटले आहे. असे असले तरी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सय्यद हुसेन शहा या मुस्लिम युवकाचाही समावेश असल्याचे पुढे आले आहे. यामुळे धर्माधारित हल्ल्याच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनिल देशमुख यांनी याबाबत घाईने निष्कर्ष न काढता अधिकृत तपास अहवालाची वाट पाहण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
हल्ल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात निर्णायक पावले उचलली आहेत. सिंधू जल करार रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. पाकिस्तानला पाण्याचा पुरवठा रोखण्यात आला आहे. यामुळे पाकिस्तानच्या कृषी अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे. त्याचप्रमाणे अटारी-वाघा सीमेवर बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानचे सर्व संरक्षण विषयक कर्मचारी परत बोलावण्यात आले आहेत.
Parinay Fuke : राजकारणाच्या ‘मेट’ मास्टरची आता बुद्धिबळावर नजर
जबाबदारीने उत्तर हवे
राजकीय नेत्यांनी या घटनेचा उपयोग करून भावनात्मक आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण तयार केले. अनिल देशमुख यांची संतुलित प्रतिक्रिया हा एक विधायक संदेश ठरतो. त्यांच्या म्हणण्यानुसार, दहशतवादाविरोधात एकत्र येणे हे अधिक महत्त्वाचे आहे. धर्माच्या आधारे समाजात फूट पाडणे हे दहशतवाद्यांच्या यशासारखेच ठरेल.
सर्व घटनांचा मागोवा घेत असताना, अनिल देशमुख यांनी दिलेली सावध आणि तथ्याधारित भूमिका महाराष्ट्रातील राजकारणाला एक जबाबदारीची दिशा देत आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेले वक्तव्य केवळ संयमी नव्हे, तर राजकीय प्रगल्भतेचे प्रतीक ठरते. राष्ट्रासाठी अशा गंभीर घडामोडींवर प्रतिक्रिया देताना राजकीय भान राखणं ही काळाची गरज आहे, हे त्यांनी आपल्या भूमिकेने अधोरेखित केले आहे.