महाराष्ट्र

Maharashtra Council session : विरोधकांचा आक्रमक पवित्रा, सत्र पुन्हा पुन्हा तहकूब

Shiv Sena UBT : संभाजी महाराजांशी तुलना करून अनिल परब अडकले

Author

अनिल परब यांच्या छत्रपती संभाजी महाराजांशी केलेल्या तुलनेच्या वक्तव्यावरून विधान परिषदेत गोंधळ उडाला. या वादामुळे परिषदेचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले.

राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असलेल्या वक्तव्यांमुळे मोठे वाद निर्माण होतात, आणि अलीकडेच शिवसेना उबाठा नेते अनिल परब यांच्या एका वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. परब यांनी स्वत:ची तुलना थेट छत्रपती संभाजी महाराजांशी केली आणि त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले. भाजप आमदारांनी या वक्तव्याचा तीव्र विरोध केला असून विधानभवनाच्या पायऱ्यांवर परब यांच्या निषेधार्थ आंदोलन केले.

भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी परब यांच्यावर कडाडून टीका केली. संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला, आणि माझा पक्ष बदलण्यासाठी छळ होतोय असे वक्तव्य परब यांनी केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. हे वक्तव्य म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणारे असून, अशा प्रकारची तुलना करणे हे विकृत मानसिकतेचे लक्षण आहे असे दरेकर यांनी म्हटले.

Jitendra Awhad : नागपुरातील जाहिरातींमुळे ड्रायव्हर्सचे डोळे नेहमीसाठी बंद

राणेंचा हल्लाबोल

या वादात भाजप नेते शंभूराज देसाई यांनीही उडी घेतली आणि परब यांच्यावर टीकास्त्र सोडले. “परब यांनी विधानसभेत छत्रपती संभाजी महाराजांसोबत स्वतःची तुलना करून मोठी चूक केली आहे. त्यांनी सभागृहात तसेच शिवाजी महाराजांच्या समाधीवर जाऊन लोकांशी माफी मागितली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

परिषदेत या वादामुळे दहा मिनिटे आणि नंतर पुन्हा पंधरा मिनिटांसाठी सत्र तहकूब करण्यात आले. भाजप आमदार नितेश राणे यांनी परब यांच्यावर पूर्वीच्या काळातील कृत्यांवरून टीका करत, “स्वतः सत्तेत असताना लोकांना छळणारे, त्यांच्या घरांवर बुलडोझर चालवणारे आता छळ होत असल्याची तक्रार करत आहेत. हे हास्यास्पद आहे,” असे परखड मत व्यक्त केले.

संतप्त प्रतिक्रिया

परब यांच्या विधानानंतर भाजप आमदारांनी तातडीने विरोध दर्शवला आणि विधानभवनाच्या पायऱ्यांवर उतरून आंदोलन केले. “संभाजी महाराजांच्या नखाची सरदेखील अनिल परब यांना नाही असे म्हणत दरेकर यांनी परब यांच्यावर निशाणा साधला. त्याचबरोबर परब यांनी सभागृहात माफी मागावी, अन्यथा त्यांचे निलंबन करावे अशी मागणीही त्यांनी केली.

शिवभक्त आणि भाजपच्या नेत्यांनी संताप व्यक्त करत परब यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची जाणीव नाही असा आरोप केला. “शब्दांचा ट्रान्सलेशन करून हा विषय मिटत नाही, महाराष्ट्र हा सुसंस्कृत राज्य आहे आणि राज्यपालांच्या अभिभाषणाचा अवमान करण्याचे काम परब यांनी केले आहे,” असे दरेकर यांनी ठणकावले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!