महाराष्ट्र

सरकारी योजनांमध्ये एकापेक्षा जास्त नोंदणी करणाऱ्यांविरुद्ध कडक निर्णय: Ashish Jaiswal

अर्जांची नामंजुरी आणि सरकारच्या कठोर निर्णयाची वाट

Author

काही लोकांनी सरकारी योजनांमध्ये एकापेक्षा जास्त नोंदणी केली आहे. सरकार याबाबत योग्य निर्णय घेऊन खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवेल, असे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले.

सरकारी योजनांचा काही लोक गैरफायदा घेत आहेत. काही लोकांनी आपली नाव एकापेक्षा जास्त योजनेमध्ये नोंदणी केली आहे. अशा सर्व लाभार्थ्यांची माहिती सरकार घेत आहे. याबाबत सरकार योग्य निर्णय घेईल अशी माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली. जयस्वाल यांचे म्हणणे आहे की, योजना ज्या घटकांसाठी तयार केल्या जातात, त्या घटकांच्या मदतीसाठीच हा निधी वापरावा. त्यांचा इशाराही स्पष्ट आहे की, कोणालाही त्रास देण्याचा उद्देश नाही, मात्र खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचणे हे सरकारचे मुख्य लक्ष्य आहे.

शेतकरी पीक विमा आणि लाडकी बहिण योजनेच्या संदर्भात जास्त गैरफायदा घेतला जात असल्याचे समोर आले आहे. पीक विमा करणार्यांचे धोरण आणि योजनेचा चुकीचा वापर या मुद्द्यांवर सरकारने कडक निर्णय घेतला आहे. सीएससी सेंटर वाले जिथे पीक नाही आहे तिथे पीक विमा करायला लागले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या वाढत्या लाभार्थी संख्येमध्ये आता एक नवा वळण येत आहे. योजनेचे उद्दीष्ट गरीब महिलांना आर्थिक मदत देणे असले तरी, काही लाभार्थींनी याचा गैरफायदा घेतला आहे. शासनाने यासंदर्भात कडक निर्णय घेण्याचे ठरवले आहे. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी याबाबत माहिती दिली आहे की, काही लोकांनी एकापेक्षा जास्त योजनांमध्ये नोंदणी केली आहे, त्यामुळे सरकार ही माहिती एकत्र करून योग्य निर्णय घेणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांन वेधलं Urban Naxal मुद्द्याकडं लक्ष

नागपुरात बहिणींच्या आकडेवारीत बदल

नागपूर जिल्ह्यात लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थींची संख्या आता चार लाख 84 हजार 614 वर पोहोचली आहे. यापैकी 25 हजार 766 अर्ज तात्पुरते मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, या योजनेला अनेक अडचणी आहेत. 3 हजार 178 अर्ज कायमस्वरूपी नामंजूर करण्यात आले आहेत. महिलांच्या खात्यात जमा होणाऱ्या रकमेची असमाधानकारकता देखील मोठा मुद्दा बनला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवर आर्थिक संकट आले असून, ज्या महिलांना निवडणुकीपूर्वी 2 हजार 100 रुपये मिळण्याचे आश्वासन दिले होते, त्यांना केवळ 1 हजार 500 रुपयेच मिळत आहेत. यामुळे महिलांमध्ये निराशा आणि असमाधानाची भावना आहे.

सरकारने आता अशा बहिणींसाठी उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे ज्या योजनेच्या उद्दीष्टानुसार पात्र नाहीत. अर्ज मागे घेणाऱ्या महिलांना केवळ एक फोन करण्याची आवश्यकता आहे, परंतु अद्याप या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. कामठी तालुक्यातून केवळ एका महिलेने याबाबत विचारणा केली आहे. त्याचप्रमाणे, भिवापूर तालुक्यात सर्वात कमी लाभार्थी असून, नागपूर ग्रामीण तालुक्यात लाडकी बहिण योजनेचे सर्वाधिक अर्ज आले आहेत. यामध्ये 2 हजार 176 अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!