
महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्याला राज ठाकरे यांनी विरोध केला होता. या भूमिकेवर प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्र राज्यात मराठी भाषेचा मुद्दा गाजत आहे. तामिळनाडूमध्ये हिंदी भाषेच्या विरोधाला सुरुवात झाल्यानंतर, महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटत आहेत. सरकारी आणि खासगी शाळांमध्ये हिंदीला तिसऱ्या भाषेच्या रूपात शिकवण्याची सक्ती करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेने महाराष्ट्रातील राजकारणात नव्या वादाला जन्म दिला आहे.
.
राज ठाकरे यांच्या भूमिकेवर आता अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रहार जनशक्ती गटाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राज ठाकरे यांना उत्तर देताना म्हटले की पाट्या मराठीच असाव्यात, पण शिकवणं काय हे राज ठाकरे कसं ठरवू शकतात? जर तुमचा मुलगा जर्मनीत शिकत असेल आणि तुम्ही त्याला जर्मन शिकवले तर ते योग्य ठरते. पण इथे जर हिंदी शिकवले तर ते चुकीचे का? मनसे कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे आता हा मुद्दा अधिक तीव्र झाला आहे.
Bhandara : भाजप कार्यकर्त्यांनी कमळ सोडून काँग्रेसचा पकडला हात
अजित पवारांचा टोला
राज ठाकरे यांनी हिंदी शिकवण्याच्या सरकारी निर्णयावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही. या घोषणेसोबतच मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईतील दादर परिसरात बॅनरबाजी करत सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे. राज ठाकरे यांचे म्हणणे आहे की मराठीतून शिक्षण घेणाऱ्या राज्यातील नागरिकांना हिंदी शिकवण्याची सक्ती करणे चुकीचे आहे. त्यांच्या या भूमिकेचा जोरदार विरोध होत आहे. यावर महाराष्ट्रातील काही लोकांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांचे म्हणणे आहे की, हिंदी एक सामान्य राष्ट्रीय भाषा आहे. ज्यामुळे देशभरातील लोक एकमेकांना सहज संवाद साधू शकतात. दुसरीकडे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या समोरच्या राजकीय पक्षांना मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळे ते केवळ वाद निर्माण करत असल्याचे अजित पवार यांनी सूचित केले. राज ठाकरे यांच्याकडून एकजुटीचा जोरदार संदेशही आला आहे.
Eknath Shinde : बाळासाहेब ठाकरे यांच्या AI आवाजावरून रणसंग्राम
राज ठाकरे यांनी एक व्हिडीओ जारी करत, महाराष्ट्राच्या विकासाबद्दल विश्वास व्यक्त केला. माझा आत्मविश्वास मला सांगतो की, आपण एकत्र आलो, तर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला एक नवा दिशा दिली जाईल. महाराष्ट्राच्या मातीत जी क्षमता आहे, ती युरोपमधल्या कुठल्याही मातीपेक्षा जास्त आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.