महाराष्ट्र

Bacchu Kadu : तालुक्यांतून मंत्रालयाकडे घडवणार क्रांती

Loan Waiver : पेरणीपूर्वी शेतकऱ्यांच्या संघर्षाची मशागत

Author

बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित केलं आहे. २ ऑक्टोबरपर्यंत निर्णय न झाल्यास मंत्रालयात मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

सात दिवस, एक मिशन आणि हजारो शेतकऱ्यांची आशा घेऊन माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पुकारलेलं अन्नत्याग आंदोलन अखेर तूर्तास थांबवलं आहे. परंतु हा पूर्णविराम नाही, तर एक अर्धविराम असल्याची जोरदार घोषणा त्यांनी केली आहे. आंदोलन मागे घेतलेलं नाही, पुढे ढकलतोय, असा स्पष्ट संदेश देत त्यांनी सरकारलाही सजग करून टाकलं.पाऊस जवळ आल्याने पेरणीसाठी शेतकऱ्यांना आपल्या गावी परतावे लागेल. याचा विचार करत त्यांनी आंदोलन स्थगित केलं. एवढंच नव्हे तर, आता तुम्हीही अन्नत्याग सोडला नाहीत तर आम्ही कुटुंबासह आत्महत्या करू, अशा थरारक प्रतिक्रिया सुमारे २००-२५० कार्यकर्त्यांकडून आल्यामुळेही हे पाऊल उचलावे लागल्याचे कडू म्हणाले.

आंदोलन स्थगित करताना त्यांनी सरकारला २ ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. तोपर्यंत कर्जमाफीची ठोस तारीख जाहीर झाली नाही, तर मंत्रालयावरच मोर्चा नेणार असल्याचा इशाराही दिला.बच्चू कडू यांनी आंदोलन संपवून घरी बसण्याऐवजी राज्यभर दौऱ्याची घोषणा केली आहे. मी प्रत्येक तालुक्यात जाईन, शेतकऱ्यांशी बोलेन, असं ठामपणे सांगत त्यांनी आगामी काळात शेतकऱ्यांना एकवटण्याची तयारी सुरू केली आहे. जात, धर्म, पक्ष बाजूला ठेवून सर्व शेतकरी एकवटावेत, हे त्यांच्या आंदोलनाचं खऱ्या अर्थानं यश ठरलं. पालकमंत्री बावनकुळे यांनी स्वतः आंदोलनस्थळी येऊन बच्चू कडूंशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांसोबत मोबाइलवरून संवाद घडवून आणण्यात आला.

Nagpur : स्थानिक निवडणुकींआधी संघ-भाजप एकत्र

आत्महत्येऐवजी झाडाला बांधा

दिव्यांगांच्या मानधनवाढीसाठी ३० जूनच्या अधिवेशनात पुरवणी मागणी मांडणार आणि कर्जमाफीबाबत समिती नेमणार, असं लेखी आश्वासन सरकारने दिलं. आंदोलनाने तरीही सरकारला बोलायला भाग पाडलं, याला कडूंनी बहुतांशी यश असं म्हणत पुढील रणनितीवर भर दिला.कर्जमाफी, हमीभाव, वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान, शासकीय खरेदीतील अडचणी या सर्व समस्यांना वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन होतं. सोयाबीनच्या भावात सहा वर्षांत बदल नाही, उलट शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर, नापिकीचा धसका आणि निसर्गाच्या कोपामुळे प्रश्न फक्त गंभीरच होत चालले आहे. राजकारणात शेतकऱ्यांच्या मुद्द्यांना महत्त्व देणारे किती आणि तितक्याच गंभीरतेने कृती करणारे किती? असा प्रश्न या आंदोलनाने उपस्थित केला.

कर्जमाफीवर अनेक राजकीय नेत्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिल्या, मंत्री भेटले, अजित पवारांनीही कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आला असल्याचे सांगितले.सात दिवसांपासून अन्नत्याग केलेल्या बच्चू कडू यांची प्रकृती खालावली आहे. सध्या त्यांना खासगी रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या शरीरात किटॉन्स बॉडी सापडल्या असून, त्यामुळे हार्ट आणि किडनीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. सोडियमचे प्रमाणही कमी असून, त्यांना उलट्यांचा त्रास होत आहे. प्रकृती सध्या स्टेबल असली तरी पुढील २४ तास अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. आणखी एक ठळक विधान त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलं कर्जामुळे आत्महत्या करू नका, आणि जर बँकेचा माणूस वसुलीसाठी आला तर त्याला झाडाला बांधून ठेवा, हे विधान केवळ रोखठोक नसून, शेतकऱ्यांच्या दुःखातून उभं राहिलेलं आहे.

Vijay Wadettiwar : तीन तुकडे, तीन रस्ते, आघाडीत बिघाडीचा नकाशा

बच्चू कडूंचं आंदोलन तात्पुरतं थांबलं असलं तरी संघर्षाची ठिणगी पेटलेली आहे. २ ऑक्टोबर हा अंतिम दिनांक ठरवण्यात आला आहे. तोपर्यंत प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांशी संपर्क साधून नवा लढा उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. हे आंदोलन केवळ एक उपोषण नव्हतं, तर शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षांचं आवाज होता जो अजूनही थांबलेला नाही.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!