महाराष्ट्र

Bacchu Kadu : शेतकऱ्यांचा कर्जमाफीची ट्रेन डीसीएम ते सीएम निवासापर्यंत 

Farmers Loan Waiver : महायुतीच्या वचनभंगावर प्रहार पक्षाचा हल्लाबोल

Author

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं असतांना प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.

महायुती सरकारच्या सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा नेहमीच चर्चेत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्जमाफी मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. परंतु अद्याप त्यांना कर्जमाफी मिळाली नाही. विरोधकही या मुद्द्यावर वेळोवेळी आवाज उठवत आहेत. सरकारकडून याबाबत काहीही ठोस निर्णय घेतलेला नाही. या परिस्थितीमुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू यांनी डीसीएम टू सीएम आंदोलनाची घोषणा केली आहे.

कडू यांच्या या आंदोलनाचा प्रारंभ 2 जून रोजी बारामतीत होणार आहे. जेथे ते अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर अर्थसंकल्प वाचन आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाद्वारे त्यांनी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. बारामतीतून सूरू होणारे हे आंदोलन नंतर नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर समाप्त होईल, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली. कर्जमाफीसाठी कडूंच्या या आक्रमक पावलांमध्ये अजित पवारांवर झालेली टीकाही समाविष्ट आहे.

Prakash Ambedkar : मी मोदी असतो, तर युद्ध पुतीनसारखं चालवलं असतं  

उपोषणाची तयारी सुरू

कडू यांनी दावा केला की, अजित पवारांनी कर्जमाफीच्या वचनावरून कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. कडू यांच्यानुसार, महायुती सरकारने कर्जमाफीचे वचन दिले होते, परंतु त्याच्या अंमलबजावणीमध्ये अपयश आले आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादीचे राजकीय बाप असलेल्या भाजपकडून कर्जमाफीची जबाबदारी अजित पवारांची आहे. बापाने दिलेले वचन मुलालाच पूर्ण करावे लागते. कर्जमाफीच्या संदर्भात सरकारला शंभर दिवस उलटून गेले तरी काही निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाने आक्रमक आंदोलनाची तयारी केली आहे.

कडू यांनी सांगितले की, आंदोलनाचे दुसरे टप्पे म्हणजे पंकजा मुंडे, बाळासाहेब पाटील आणि संजय राठोड यांच्या घरासमोर होणार आहेत. यानंतर 7 जुलैपासून तुकडोजी महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या मोझरी येथील आमरण उपोषण सुरू होईल. महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या आधी जाहीरनामा करतांना शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच महायुतीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल असा विश्वास दिला होता. परंतु, सत्तेत आल्यानंतर अजूनही कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारने ठोस निर्णय घेतलेला नाही.

Farmer Loan Waiver : पश्चिम विदर्भात गडगडला उद्धव ठाकरे गटाचा ट्रॅक्टर

31 मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्ज भरण्याचे निर्देश दिले होते, त्यामुळे कर्जमाफीच्या बाबतीत शेतकऱ्यांमध्ये असमाधान दिसून येत आहे. कर्जमाफीचा मुद्दा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असताना, सरकारने या मुद्द्यावर लक्ष देणे आवश्यक असल्याची भावना प्रकट होत आहे. बच्चू कडू आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलनाची ही बाब शेतकऱ्यांमध्ये अधिक जास्त चर्चा होत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!