
शनीच्या साडेसातीपेक्षा त्याची अडीचकी अर्थात ढय्या जास्त त्रासदायक असते. असाच काहीसा ‘सिन’ आता भंडारा जिल्हा परिषदेत बघायला मिळणार आहे.
ज्योतिष्यशास्त्रात कर्माचं फळ देणारा ग्रह म्हणून शनीला ओळखलं जातं. व्यक्ती जसे कर्म करतो तशी फळं त्याला शनी देतो. शनीची साडेसाती माहिती नाही असं कदाचितच एखादा असेल. शनीची साडेसाती साडेसात वर्षांची असते. पण शनीची एक मिनी साडेसाती सुद्धा असते, हे फारक कमी लोकांना ठाऊक आहे. त्याला हिंदीत ‘ढय्या’ किंवा ‘पनवती’ आणि मराठीत ‘अडीचकी’ म्हणतात. एखाद्या व्यक्तीच्या राशीपासून शनी चौथा किंवा आठवा आला की, ढय्या सुरू होते. हा अडीच वर्षाचा कालावधी शनीच्या साडेसातीपेक्षाही भयंकर कडक असतो. या काळात शनी व्यक्तीला त्याच्या कर्माची फळं अत्यंत कठोर आणि तीव्रतेनं देतो. असाच काहीसा ‘सिन’ आता भंडारा जिल्हा परिषदेत बघायला मिळू शकतो. त्याबद्दल आता जिल्हा परिषद वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
भंडारा जिल्हा परिषदेत अध्यक्षपद स्वत: चालून भाजपकडं आलं होतं. परंतु भाजपनं असे काही कर्म केले की, दैवानं दिलेले पद कर्मानं काँग्रेसकडे नेलं. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात ‘देवा’ची कृपा असलेल्या एका नेत्यानं उपाध्यक्षपद मात्र महायुतीकडं खेचून दाखविलं. या निवडणुकीनंतर आता शुक्रवार, 7 फेब्रुवारीला विषय समिती सभापतिपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वी भाजपचा एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चार असे एकूण पाच जिल्हा परिषद सदस्य गायब झाले आहेत. भंडाऱ्यातील एका नेत्यानं त्यांच्या हातावर एक खास ‘घड्याळ’ बांधलं. ही घड्याळ बांधताच हे पाचही सदस्य अनिल कपूरप्रमाणे ‘मिस्टर इंडिया’ झालेत.

भाई वो सब देख रहा है..
गायब झालेले पाचही सदस्य ‘ईश्वराच्या’ छत्रछायेखाली आहे, हे ‘द लोकहित लाइव्ह’ने आपल्या यापूर्वीच्या बातमीत नमूद केलं. हे पाचही सदस्य कुठे आहेत, कोणासोबत आहेत, काय करत आहेत याची पूर्ण खबर भंडाऱ्यातील एका ‘हेवीवेट’ नेत्याजवळ आहे. हा नेता अगदी ग्रहमालिकेतील शनीसारखा सध्या शांतपणे सगळं काही पाहात आहे. भंडारा जिल्हा परिषदेतील अध्यक्ष आणि विषय समिती निवडणुकीत दगा फटका करणाऱ्यांच्या नोंदी हा नेता अगदी शनीप्रमाणे ठेवत आहे. योगायोग असा की, पंचांगानुसार 29 मार्च 2025 रोजी शनी कुंभ राशीतून मीन राशीत जाणार आहे. शनीच्या या राशी बदलामुळं मकर राशीची साडेसाती संपेल.
मकर राशीची साडेसाती संपणार. पण कुंभ, मीन आणि मेष या राशींना शनीच्या कडक परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. इकतेच नव्हे तर सिंह आणि धनु राशीला शनीची ढय्या लागणार आहे. त्यामुळं एकाच वेळी पाच राशीचे लोक शनीच्या चपेट्यात येणार आहेत. योगायोगानं भंडारा जिल्हा परिषदेतून गायब झालेल्या सदस्यांची संख्याही पाच आहे. शनी कुंभ राशीतून मीन राशीत गेल्यानंतर मकर राशीवाल्यांची साडेसाती संपले. त्यामुळं आपण सुटलो, असा भ्रम मकर राशीवाल्यांचा होत आहे.
कोणताही व्यक्ती कोणतेही घर बदलल्यानंतर आपले काही राहून तर गेले नाही ना? हे पाहण्यासाठी पुन्हा एकदा जुन्या घरात जाऊन येतो. अगदी त्याच पद्धतीनं राशी बदलल्यानंतरही शनीही काही महिन्यात पुन्हा आधीच्या राशीत येत असतो. त्याला ज्योतिष्याच्या भाषेत ग्रहाचं वक्री होणं असं म्हटलं जाते. वक्री होण्याची ही गोष्ट इथे यासाठी महत्वाची आहे, कारण भंडारा जिल्हा परिषदेतून गायब झालेल्या पाच राशीवाल्यांच्या हातावर एका नेत्यानं ‘घड्याळ’ बांधली आहे. आपण सहीसलामत सुटलो असं या नेत्याला वाटत आहे. पण शनीसारखं ‘भाई वो सब देख रहा है’ याचा विसर या नेत्याला पडलेला दिसत आहे.
हिसाब सब का होगा
‘घड्याळ’ बांधणाऱ्या या नेत्याला आपण सुटलो असं वाटत आहे. पण त्याच्यावरही ‘देवा’ची कृपा असलेल्या शनीची दृष्टी आहे. शनीच्या दृष्टीपासून साक्षात महादेवही वाचू शकले नव्हते, असं शिवमहारपुराण, शनी महात्म्यामध्ये सांगितलं आहे. त्यामुळं शनीच्या प्रकोपातून कोणीही सुटणार नाही, असं आदीअनंत काळापासून म्हटलं जातं. आता एवढं सगळं वाचल्यानंतर लोकांना शनी ‘व्हिलन’ वाटत असेल. शनी क्रुर वाटत असेल. पण साक्षात शिवानं सांगितल्यानुसार दगाफटका करणाऱ्यांना, धोका देणाऱ्यांना, धर्म न पाळणाऱ्यांना, निती-नियम, अपराध करणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी शनीची उत्पत्ती केली गेली आहे. त्यामुळंच शनीला ‘कर्मफलदाता’ अशी उपाधी सर्व देवांनी दिली आहे.
महादेवांनी स्वत:लाही शनीच्या शिक्षेपासून दूर ठेवलं नव्हतं. त्यांच्यावरही शनीने जेव्हा दृष्टी टाकली तेव्हा ते देवाचे गजअर्थात हत्ती बनले होते. आता शनीनं महादेवांनाही सोडलं नाही म्हटल्यावर सामान्य माणसांची काय गत. महायुतीचा धर्म पाळणारा असाच एक ‘शनीदेव’ भंडारा जिल्हा परिषदेवर सध्या लक्ष ठेऊन आहे. कोण दगा फटका करत आहे, याची नोंद होत आहे. भंडारा जिल्हा परिषदेत पदासाठी तर कुणी दगा केलाच तर त्यांना पुढीच अडीच वर्ष कडक ढय्या सहन करावी लागणार असल्याचं चित्र तयार झालं आहे. आधी सांगितल्याप्रमाणं शनीची ना साडेसाती चांगली ना ढय्या.
शनी पश्चिम दिशेला बलवान असतो असं ज्योतिष्यात सांगितलं आहे. यम हा शनीचा भाऊ आणि सूर्याचा मुलगा. यमाची दिशा दक्षिण मानली गेली आहे. धर्मशास्त्रात दक्षिण दिशा शुभ मानली जात नाही. भंडाऱ्यापासून पश्चिम दिशेला मुंबईचं मंत्रालय आहे. या मंत्रालयातून राज्याचा कारभार चालतो. असं न हो की भंडाऱ्यातून शनी पश्चिमेला सूत्रं हलवो अन् ‘दक्षिण’ भागातून येणारी एखादी ऊर्जा दगा करणाऱ्यांसाठी पुढील अडीच वर्ष त्रास देणारी ठरो, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.