महाराष्ट्र

Bhaskar Jadhav : बच्चू कडूंचाही ‘जरांगे’ होणार

Shiv Sena : शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सरकारचे शब्द किती खरे

Author

अमरावतीच्या मोझरी येथे गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेले बच्चू कडू यांचे अन्नत्याग उपोषण सध्या स्थगित करण्यात आले आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव गटाचे नेत्यानी कडूंची तुलना मनोज जरांगे पाटील यांच्याशी केली आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सात दिवसांपासून सुरू असलेले अन्नत्याग उपोषण प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शनिवारी अचानक स्थगित करण्याचा निर्णय घेतला. शिवसेना (उद्धव ठाकरे) यांचा पाठिंबा असलेल्या या आंदोलनासाठी बच्चू कडू यांनी राज्य सरकारकडे ठराविक मुदतीची अंतिम संधी देत 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांना लेखी आश्वासन दिल्याचा उल्लेख असून, तात्पुरता हा निर्णय आंदोलन स्थगित करण्याचा घेण्यात आला आहे. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही गुरुकुंज मोझरी येथील उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांविषयीचा सरकारचा पत्रवाटप वाचून दाखवले आणि यामुळे बच्चू कडू यांनी काही काळासाठी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत सरकारच्या आश्वासनांवर शंका उपस्थित केली आहे. त्यांनी म्हटले की, मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन केले, त्यावेळीही मुख्यमंत्रीांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आश्वासन दिले होते. पण त्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. त्यामुळे बच्चू कडू यांना दिलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवणे कठीण आहे.

Ashok Uike : आदिवासी मुलांचे स्वप्न रंगतंय शिक्षणाच्या फुलांनी 

पुढील टप्प्याची तयारी

जाधव यांच्या मते, भाजप सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागण्या पूर्ण करेल का, याची कोणतीही खात्री देता येत नाही. बच्चू कडू यांनी आंदोलन स्थगित करताना सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजूनही कर्जमाफीची तारीख जाहीर करण्यास तयार नाही. मात्र आम्ही त्यांना २ ऑक्टोबरपर्यंतची वेळ दिली आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याच्या पद्धतीने आंदोलन पुन्हा सुरू होईल. पावसाळ्याच्या काळात शेतकऱ्यांना पेरणीसाठी वेळ आवश्यक असल्यामुळे आणि वर्षभराचे नुकसान टाळण्यासाठी सध्या आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. बच्चू कडू यांनी पुढे सांगितले की, आम्ही १६ जूनपासून अन्नत्यागासोबतच जलत्याग आंदोलनही सुरू करणार होतो. पण डॉक्टरांनी उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे.

उपोषण सोडवावे, अशी विनंती अनेक हितचिंतकांनी केली आहे. काही कार्यकर्त्यांनी तर कुटुंबासहित आत्महत्या करणार असल्याचे भावनिक वक्तव्य केले आहे, ज्याचा आम्ही आदर राखत आहोत. अशा भावनिक परिस्थितीत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला असला तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठीचा लढा अजूनही सुरू राहणार आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होईपर्यंत आणि मागण्या मान्य होईपर्यंत बच्चू कडू यांनी आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पुढील काही महिने तापलेल्या वातावरणाची अपेक्षा आहे.

MSRTC : प्रवास सुधारण्यासाठी एसटीला नवे मिळाले विभाग

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!