महाराष्ट्र

दादा, साहेबांच्या जिल्ह्यासह राज्यात BJP कडून बारीक वॉच

शिवसेना, राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांवर भाजपचे संपर्कमंत्री

Share:

Author

भाजपने महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील 17 संपर्क मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीनं महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालकमंत्र्यांवर भाजपचा वॉच राहणार आहे. भाजपने मंत्र्यांवर बारीक नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने या काही पक्षांतर्गत संपर्क मंत्री नियुक्त केले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांमध्येच हे संपर्क मंत्री आहेत. पक्ष संघटन आणि राज्य सरकार यामध्ये समन्वय साधण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. भाजपचे संपर्क मंत्री हे दर महिन्याला दोनदा आपल्याकडे प्रभार असलेल्या जिल्ह्यांना भेट देतील. सरकार आणि पक्ष संघटनामध्ये योग्य समन्वय साधण्याबरोबरच कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. या नियुक्तीतून भाजपनं आपले ‘रॉ’ एजन्टच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसवर नजर ठेवण्यासाठी नेमल्याचं दिसत आहे.

सत्ता संतुलनाची उपाय

महायुतीत तीन पक्षांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री नियुक्त करण्यात आले आहेत. भाजपचं वर्चस्व असलेल्या काही जिल्ह्यांत मित्र पक्षाचे पाकलमंत्री आहेत. त्यामुळं स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. यावर उपाय म्हणून भाजपने संपर्क मंत्री नेमण्याचा निर्णय घेतला. यातून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कार्यपद्धतीवर भाजपकडून बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.

प्रश्न विचारा आयोगाला; पोटदुखी भाजपला

बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे प्रकरण चांगलेच तापले आहे. त्यांना पालकमंत्र्यांच्या यादीतून डच्चू देण्यात आला. मात्र भाजपनं भावाची विकेट काढण्यासाठी बहिणीची अर्थात पंकजा मुंडे यांची बीडच्या संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळं पुन्हा एकदा मुंडे व्हर्सेस मुंडे सामना तर सुरू होणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या नियुक्तीतून भाजपनं पंकजा यांना धनंजय मुंडेंना ‘क्लीन बोल्ड’ करण्याची संधी दिली आहे. या नियुक्तीतून पंकजा मुंडेंना पुन्हा राजकीय फलंदाजीसाठी महत्त्वाची संधी मिळाली आहे.

पाठ दाखविणारे विखे पाटील

राधाकृष्ण विखे पाटील यापूर्वीच्या महायुती सरकारमध्ये अकोल्याचे पालकमंत्री होते. विखे पाटील हे अकोल्याला पाठ दाखविणारे पाकलमंत्री ठरले. 15 ऑगस्टच्या शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमालाही त्यांनी दांडी मारली. अकोल्यातील भाजप कार्यकर्त्यांशी त्यांची दुरावाच ठेवला. त्यांना आता वाशिम जिल्ह्याचं संपर्क मंत्री करण्यात आलं आहे. त्यामुळं आता विखे पाटील वाशिम जिल्ह्याच्या किती संपर्कात राहतात हे बघण्यासारखं ठरणार आहे.पुण्यात अजित पवारांचे अबाधित राजकीय वर्चस्व आहे. मात्र येथे भाजपने चंद्रकांत पाटील यांना संपर्क मंत्री केले आहे. पाटील यांच्या नियुक्तीमुळे पुण्यात भाजपचं अजित पवारांच्या हालचालींवर बारीक लक्ष राहणार आहे. जळगाव जिल्ह्यात भाजपने मंत्री गिरीश महाजन यांना संपर्क मंत्री करून पुन्हा एकदा अधिकार दिले आहेत.

प्रशासनाला आठवले Development करावी लागते 

बुलढाणा जिल्ह्यात भाजपची चांगली पकड आहे. मात्र या जिल्ह्यात आकाश फुंडकर यांना पालकमंत्री पद मिळालं नाही. त्यांना अकोल्याचं पालकमंत्री करण्यात आलं.
राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचे वर्चस्व आहे. यावर बारीक नजर ठेवण्यासाठी भाजपने आकाश फुंडकर यांना संपर्क मंत्रीपदी नियुक्त केले आहे. बुलढाणा पालकमंत्री पदाच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला. येथे वाईचे आमदार मकरंद जाधव हे पालकमंत्री आहेत. भाजपने येथे आकाश फुंडकर यांनी संपर्कमंत्री केलं आहे. यवतमाळमधून मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात अनेक तक्रारी होत्या. अशोक उईके यांना संपर्क मंत्री करण्यात आलं आहे. राठोड आणि उईके दोघेही सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत.

दादा, शिंदेंकडे लक्ष

भाजपच्या या निर्णयावर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची प्रतिक्रिया काय असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे. भविष्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना देखील भाजपच्या पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांमध्ये संपर्क मंत्री नेमण्याचा विचार करू शकते. भाजपचा हा निर्णय पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनं असल्याचं सांगण्यात येत आहे. दुसऱ्या पक्षाचे पालकमंत्री असल्यानं भाजपच्या कार्यकर्त्यांना पोरकं वाटू नये, हा यामागील हेतू असल्याचं सांगण्यात येत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!