
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच भाजप पक्षाने विक्रम प्रस्थापित केला आहे. हा टप्पा गाठणारा तो पहिला आणि एकमेव पक्ष ठरला आहे.
महाराष्ट्रातील राजकीय क्षितिजावर भारतीय जनता पक्षाने एक नवा मैलाचा दगड पार केला आहे. सदस्य नोंदणीच्या बाबतीत ऐतिहासिक कामगिरी करत भाजप महाराष्ट्रात दीड कोटी सदस्य संख्या गाठणारा पहिला पक्ष ठरला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा विक्रम प्रस्थापित करण्यात आला आहे. या मोठ्या टप्प्यामुळे भाजपने पुन्हा एकदा आपली संघटनात्मक ताकद सिद्ध केली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर भाजप पक्षाने सदस्य नोंदणी मोहिमेला वेग दिला होता, आणि त्याचा मोठा परिणाम आता समोर आला आहे. भाजपने तब्बल दीड कोटी सदस्यांचा टप्पा पार करत महाराष्ट्राच्या राजकीय पटावर स्वतःची दृढ उपस्थिती अधोरेखित केली आहे. इतकंच नाही, तर भाजपने लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांपेक्षा जास्त सदस्य नोंदणी केली आहे. लोकसभेत 1 कोटी 49 लाख 66 हजार 577 मते मिळाल्यानंतरही पक्षाने दीड कोटी सदस्यांची नोंदणी पूर्ण केली आहे.

Devendra Fadnavis : जबाबदारीला नाकारतील ते कठोर कारवाई भोगतील
जागतिक स्तरावरील महत्त्व
भाजप हा जगातील सर्वांत मोठी सदस्यसंख्या असलेला पक्ष असल्याचा दावा सातत्याने करतो. चीनच्या कम्युनिस्ट पक्षापेक्षाही अधिक सदस्यसंख्या असल्याचे पक्षाने सांगितले आहे. महाराष्ट्रात भाजपची लोकसभेतील कामगिरी अपेक्षेइतकी नसल्यानंतरही मागील निवडणुकीपेक्षा 775 मते जास्त मिळाली होती. विधानसभेत मात्र भाजपला मोठे यश मिळाले आणि 1 कोटी 72 लाख 93 हजार 650 मते पक्षाच्या झोळीत पडली. मात्र, या विजयामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांचा वाटाही होता.
भाजपने स्वतःची ताकद वाढविण्यासाठी सदस्य नोंदणी मोहिमेला जोर दिला. प्रारंभी पक्षाने एक कोटी सदस्यांचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, राष्ट्रीय नेतृत्वाने हे लक्ष्य 50 लाखांनी वाढवून दीड कोटींच्या दिशेने वाटचाल सुरू केली आणि अखेर हे उद्दिष्टही पूर्ण करण्यात आले. ही सदस्य नोंदणी मोहिम प्रभावी करण्यासाठी भाजपने संपर्क से समर्थन आणि एक बूथ, 100 सदस्य अशी अभियानं राबवली. भाजपच्या या पराक्रमी अभियानणे सर्वाना मोठा धक्काच बसला आहे.
Akot : माओवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा पोलिसांचा मास्टर प्लॅन
राजकारणात खळबळ
ग्रामीण भागांपासून शहरी परिसरांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया, पदयात्रा, सभांचे आयोजन करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या थेट भेटी अशा विविध मार्गांचा अवलंब करण्यात आला. यामुळे केवळ भाजपच्या पारंपरिक मतदारांनाच नाही, तर नवीन तरुण मतदार, महिला आणि शेतकरी वर्गालाही पक्षाकडे आकर्षित करण्यात यश मिळाले. भाजपच्या या दीड कोटी सदस्य नोंदणीमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.