महाराष्ट्र

Pravin Tayade : वीस वर्ष सभागृहात बसणाऱ्या कडूंना आता रस्त्यावर करमतय

Amravati : कर्जमाफीच्या लढ्यात नव्या वादाची भर

Author

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनावर भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी टीका करत सडकून प्रहार केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर सत्तेत आलेल्या महायुती सरकारकडून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. अर्ज, मोर्चे, आंदोलनांची मालिका सुरू असतानाही प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचा एकही रुपया जमा झालेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात निराशेची आणि नाराजीची लाट अधिकच तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी गुरुकुंज मोझरीच्या पवित्र भूमीत बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरूवात केली आहे.

कडूंच्या या आंदोलनाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र, या लढ्याला आता राजकीय टीका आणि प्रतिटीकांचा रंग चढू लागला आहे. अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बच्चू कडूंना पराभूत करणारे भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी या आंदोलनावर सडकून टीका केली आहे. त्यांनी जुना सोफिया प्रकल्प आठवत सवाल केला त्या वेळीही हेच आंदोलनकर्ते सक्रिय होते. पण अचानक असे काय झाले की आंदोलन थांबवावे लागले?इतकेच नव्हे तर, तायडे यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, बच्चू कडू दर दोन तासांनी व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन बसतात. मग शेतकऱ्यांनी अशा नेत्यांकडून नेमकी काय अपेक्षा ठेवावी?

Yavatmal : कृषी विभागाचा बोगस बियाण्यावर मोठा वार

शिक्षक घोटाळ्याचा मुद्दा

आपल्या टीकेचा रोख अधिक तीव्र करत त्यांनी आंदोलनाच्या प्रामाणिकतेवर  प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.  मी स्वतः शेतकरी आहे. कोणताही शेतकऱ्यांचा प्रश्न आमच्यासाठी जिव्हाळ्याचा आहे. मला विश्वास आहे की मुख्यमंत्री निश्चितच योग्य धोरण आखतील, असे आश्वासन तायडे यांनी दिले. मात्र याचवेळी त्यांनी राष्ट्रसंतांच्या समाधीजवळ सुरू असलेल्या उपोषणात महिलांविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यांचा निषेधही केला. त्यांनी टोला लगावत म्हटले, 20 वर्ष सभागृहात राहिल्यानंतर बच्चू कडूंना आता रस्त्यावरच राहावेसे वाटते आहे. मोझरीला आंदोलन का? कारण नॅशनल हायवे जवळ आहे. चक्का जाम करता येतो, स्वतःचा पेंडॉल जाळता येतो  हा त्यांच्या आंदोलनाचा एकच प्रकार आहे.

प्रवीण तायडे यांनी आणखी एक मुद्दा उचलून धरला. बच्चू कडू कायम म्हणतात की आम्हाला आमदारकीची गरज नाही. मग आता शिक्षक मतदारसंघात निवडणूक लढवण्याची एवढी घाई का? कधीकाळी हेच शिक्षकांना शिव्या देत होते. राज्यात जो शिक्षक भरती घोटाळा झाला, तो त्यांच्या राज्यमंत्री पदाच्या काळातच झाला. त्यांनी आधी त्यावर उत्तर द्यावे. दरम्यान, गुरुकुंज मोझरीतील आंदोलनाचा उग्रपणा वाढताना दिसत आहे. राज्य सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असले तरी राजकीय टीका-प्रत्यटीकेमुळे या प्रश्नावरची गुंतागुंत वाढली आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का, की राजकीय आरोपांच्या सावलीत हा लढा अधिकच गुंतणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Girish Vyas : माजी विधान परिषद सदस्यांच्या बॅगेवर चोराट्यांचा डल्ला

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!