देश

Operation Sindoor : जागतिक रणनीती पोहोचणार प्रत्येक घरांत

BJP : मोदी सरकारची विकसित भारतकडे वाटचाल

Author

भारत सरकारच्या ऑपरेशन सिंदूरची यशोगाथा जागतिक स्तरावर मांडल्या जात आहे. आता ही गाथा देशाच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून करारी उत्तर दिलं. या धडक कारवाईत पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. देशाच्या संरक्षण धोरणात झालेला हा मोठा टप्पा आता केवळ सामरिक विजय न राहता, राजकीय आणि जनप्रबोधनाच्या दिशेने वळताना दिसतोय. भारत सरकार आता या कारवाईमागील स्पष्ट भूमिका आणि पाकिस्तानच्या दहशतवाद पोसणाऱ्या धोरणांचा पर्दाफाश करण्यासाठी जागतिक व्यासपीठावर उतरलं आहे. यासाठी केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय खासदारांचं निवडक शिष्टमंडळ तयार करण्यात आलं आहे.

शिष्टमंडळ 22 मेपासून 10 दिवसांच्या दौऱ्यावर 5 ते 8 प्रमुख देशांना भेटी देणार आहे.  ऑपरेशन सिंदूरमधील भारताची भूमिका त्यांनी टप्प्याटप्प्याने मांडणार आहेत.या रणनीतीचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे देशातील जनतेसमोर या यशाचं सादरीकरण आणि मोदी 3.0 तयारीचं प्रात्यक्षिक. भाजपनं यासाठी एक विशेष मोहीम उभी केली आहे. ‘घरोघरी सिंदूर अभियान’. या अभियानात महिलांना भेटवस्तू म्हणून कुंकवाचं वाटप केलं जाणार आहे, जे ऑपरेशन सिंदूरचं प्रतीक मानलं जात आहे. हे अभियान 9 जूनपासून सुरू होणार आहे. याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती.

Pravin Datke : धागा धाग्याने गुंफला संघर्ष, अखेर न्यायाची वीण बसली

युवांशी नवे बंध

 

अभियानाचं उद्दिष्ट केवळ प्रतीकात्मक नसून, मोदी सरकारच्या अकरा वर्षांच्या यशाचा जनतेशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न आहे. दररोज 15-20 किलोमीटर पदयात्रा करत खासदार मतदारसंघात पोहोचणार आहेत. मंत्र्यांनीही आठवड्यातून दोन दिवस किमान 25 किमीचा जनसंपर्क प्रवास करायचा आहे.ही संपूर्ण मोहीम मोदी सरकारची 11 वर्षे संकल्प ते सिद्धी या शीर्षकाखाली राबवण्यात येणार आहे. 29 मेपर्यंत प्रत्येक विधानसभा क्षेत्रात जनसंपर्क अभियान होणार असून, बूथ स्तरावर कार्यकर्ते 1+4 किंवा 1+2 या सूत्रांनुसार दररोज जनतेशी संपर्क साधतील. 2 जून ते 5 जूनदरम्यान जिल्हास्तरावर पत्रकार परिषदांचे आयोजन करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष स्वतः दिल्लीत 7 किंवा 8 जून रोजी पत्रकार परिषद घेतील. प्रत्येक जिल्ह्यात व्यावसायिकांशी बैठक घेऊन तीन महत्त्वाच्या धोरणांवर चर्चा होईल. त्याचबरोबर मंडळ स्तरावर विकसित भारत संकल्प सभा आयोजित केली जाईल. शहरांतील मोहल्ला व गावांतील चौपालमध्ये सरकारच्या योजनांची माहिती दिली जाईल. आयुष्मान भारत शिबिरांच्या माध्यमातून आरोग्य सेवा पोहोचवली जाणार असून, प्रत्येक जिल्ह्यात किमान 100 लाभार्थ्यांनी यात सहभागी व्हावं, अशी अपेक्षा आहे. याशिवाय डिजिटल पातळीवरही स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहे. व्हिडीओ व ग्राफिक्स आधारित क्रिएटिव्ह सामग्रीद्वारे युवकांचा सहभाग वाढवण्याचा भाजपचा मानस आहे.

Nagpur Riots : मुख्य आरोपी फहीम खानचा जामीन न्यायालयाने फेटाळला

सर्व जिल्ह्यांमध्ये सरकारी योजनांच्या प्रदर्शनांचं आयोजन केलं जाणार आहे. 15 जून ते 20 जूनदरम्यान योग प्रशिक्षण शिबिरं आयोजित केली जाणार आहेत, जे आरोग्य व संस्कृतीच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतील.मोदी 3.0 दिशेने भाजपचं हे संघटित पाऊल केवळ निवडणुकीसाठी नाही, तर एका नव्या भारताच्या निर्मितीचा आरंभ असल्याचा भाजपचा दावा आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!