महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : भाजप आणि संघ संविधान बदलू पाहत आहेत

Congress : फडणवीस सरकार चालवतंय औरंगजेबाचं राजकारण

Author

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दावा केला की, भाजप आणि संघ 2034 मध्ये नवीन संविधान लागू करण्याची तयारी करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान बदलण्याच्या केलेल्या वक्तव्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून संविधानाचा मुद्दा राजकीय वर्तुळात फिरत आहे यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवत आहे. सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर थेट आरोप करत सांगितले की, भाजप 2034 मध्ये देशात नवं संविधान लागू करण्याच्या तयारीत आहे. त्यांनी म्हटले की, या दिशेने भाजप आणि संघ परिवार बैठका घेऊ लागले असून नव्या संविधान निर्मितीची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.

सपकाळ यांच्या या आरोपानंतर देशाच्या राजकारणात एक नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे. सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर चौफेर टीका करत म्हटले की, मोदींना भारताचं संविधान मान्यच नाही. ते संविधानाच्या तत्वांना नाकारतात आणि भाजपही याच विचारधारेवर चालतो. सपकाळ म्हणाले, गेल्या अकरा वर्षात मोदींनी देशासाठी काहीही भरीव केलं नाही, त्यामुळे आता ते बाबासाहेब आंबेडकर यांचा मुद्दा पुढे करून भ्रम निर्माण करत आहेत. त्यांनी ठामपणे सांगितले की, पंडित नेहरूंनी बाबासाहेबांना कायदा मंत्री बनवून सन्मान दिला, पण भाजप मात्र आंबेडकरांना सतत असन्मानित करत आला आहे.

Navneet Rana : निवडणुकीत हिंदूंवर अन्यायाचं षडयंत्र

संघाचं मनुस्मृतीवर प्रेम

नाशिकच्या काळाराम मंदिरातील ऐतिहासिक प्रसंगाची आठवण करून देत सपकाळ यांनी दलित आणि ओबीसी समाजात भाजप फूट पाडत असल्याचा आरोप केला. त्यांनी संघावरही टीकेचा बाण सोडला आणि म्हटले, भाजप आणि आरएसएसला बाबासाहेब विद्वान वाटतच नाहीत. त्यांना बंच ऑफ थॉट्स हेच बायबल आहे. जर त्यांना खरोखर बाबासाहेबांचे विचार मान्य असतील, तर त्यांनी गोळवलकर गुरुजींच्या या पुस्तकाची होळी करावी. हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, संघ आणि जनसंघ यांच्याकडे मनुस्मृतीनुसार संविधान असावं, अशीच कल्पना होती आणि त्याचेच आता प्रयत्न सुरू आहेत.

2034 मध्ये नवं संविधान लागू करण्यासाठीची प्रक्रिया गुपचूप सुरू असून, त्यासाठी नियमित बैठका होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. 2024 निवडणुकीत जेव्हा 400 पारचा नारा दिला गेला, तेव्हा काही भाजप उमेदवारांनी स्पष्ट सांगितलं होतं की संविधान बदलण्यासाठीच ही ताकद हवी आहे, असंही त्यांनी नमूद केलं. भाजपने जर खरंच संविधान बदलायचं असेल, तर त्यांनी उघड भूमिका घ्यावी. मुखात राम, पण बगल में छुरी हे चालणार नाही, अशी तीव्र टीका करत त्यांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. औरंगजेबच्या उदाहरणातून सपकाळ यांनी फडणवीस सरकारवरही निशाणा साधला.

Ashish Jaiswal : विरोधकांच्या पाचशे रुपयांच्या प्रचाराचा फोडला फुगा

पुतळ्यांवर थेट सवाल

औरंगजेब जसा धर्माचा वापर सत्ता चालवण्यासाठी करत होता, तसंच आता फडणवीस सरकार करत आहे. इंग्रजांपेक्षा संविधान परवडणार नाही, अशी भूमिका काहींनी घेतली होती. हेच लोक आज इतिहास विसरायला लावत आहेत, असा आरोप करत त्यांनी विचारलं, मग अशा लोकांचे पुतळे काढणार का? अमित शाह यांच्यावर निशाणा साधताना सपकाळ म्हणाले, जर तुम्ही औरंगजेबच्या कबरीला समाधी म्हणत असाल, तर मग गोळवलकर आणि हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळांनाही कबर म्हणायला हवं. यासोबतच त्यांनी फुले चित्रपटाला विरोध करण्याच्या मागचं षड्यंत्रही उघड करत भाजपवर जोरदार टीका केली. हर्षवर्धन सपकाळ यांच्या या विधानांमुळे राजकारणात मोठं वादळ उठण्याची चिन्हं आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!