महाराष्ट्र

Operation Sindoor : पाकमध्ये ‘मातम’; काही मिनिटांत जम्मूत वीज सुरू

India Vs Pakistan : प्रचंड बॉम्बहल्ल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत

Share:

Author

पाकिस्तानचे दात घशात घातल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच जम्मू आणि काश्मीरातील खंडीत केलेल्या वीज पुरवठा सुरू करण्यात आला. पाकिस्ताननं हल्ला केल्यानंतर जम्मू आणि काश्मिरात तातडीनं ‘ब्लॅक आऊट’ करण्यात आलं. मात्र लवकरच जम्मू पुन्हा लखलखू लागलं.

पूर्वीच्या काळी हल्ल्यांना सुरुवात झाल्यानंतर अनेक दिवसांपर्यंत ‘ब्लॅक आऊट’ कायम राहायचे. मात्र इतिहासात पहिल्यांदाच अवघ्या काही तासात जम्मू आणि काश्मिर पुन्हा लखलखू लागलं. भारतीय सैन्यानं पाहिलं. हल्ला परतावून लावला. तुफान बॉम्बवर्षाव केला. भारतानं लाहोर, इस्लामाबाद, सियालकोट, बाजवाड येथे पाकिस्तानी सैन्याला धू..धू.. धुतलं. काही मिनिटं पाकिस्तानवर तुफान पाऊस पडेल अशा पद्धतीनं भारतानं मिसाइल हल्ले केले. त्यामुळं गुरूवारचा दिवस पाकिस्तानसाठी ‘मातम’चा ठरला.

गुरुवारी सकाळी भारतीय लष्करानं लाहोरमधील एअर डिफेन्स यंत्रणा नष्ट करण्यात आली. त्यानंतरही रात्री पाकिस्ताननं रात्री पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न केला. त्याला भारतीय लष्करानं चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानचं दुसरं एअर डिफेन्स सिस्टमही नष्ट करण्यात आलं. त्यामुळं आता अख्ख्या पाकिस्तानवर कुठेही हवाई हल्ला करणं आता भारताला शक्य झालं आहे. आता पाकिस्तानजवळ कोणताही एअर डिफेन्स यंत्रणा नाही. त्यामुळं पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांमध्येही आता भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

आठ हजार खाती ब्लॉक

भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावानंतर सोशल मीडियावरही लक्ष कडक करण्यात आलं आहे. भारताने ट्विटरला आठ हजार खाती ब्लॉक करण्यास सांगितलं आहे. केंद्र सरकारने सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म्स, मीडिया स्ट्रिमिंग सेवा व डिजिटल इंटरमिजिअरीज (मध्यस्थ) यांनाही इशारा दिला आहे. पाकिस्तानमधील वेब सिरीज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट आणि इतर स्ट्रिमिंगवर बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.

माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार ही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळं आता भारत आणि पाकिस्तान संदर्भातील माहिती प्रसारित करताना सर्वांना विचार करावा लागणार आहे. विशेषत: भारताच्या राष्ट्रीयतेला धक्का लागणाऱ्या साहित्याविरोधात तातडीनं कारवाई करण्यात येणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. भारतीय लष्करी कारवाईबद्दल चुकीची माहिती, इतर राष्ट्रांशी संबंध बिघडवणारी माहिती प्रसारित केल्यास आता कारवाई केली जाणार आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात अनेक भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. काही जण जखमी झालेत. त्यानंतर भारतानं पाकिस्तानस्थित दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला. यामुळं चवताळलेल्या पाकिस्ताननं भारतीय शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सलग दोन दिवस भारतानं हे हल्ले परतावून लावले. या प्रतिहल्ल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच जम्मू आणि काश्मिरमध्ये जनजीवन सुरळीत झालं. वीज पुरवठाही सुरू करण्यात आला.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!