प्रशासन

Gondia : बोगस शिक्षक भरतीचे बीज तीन वर्षांपूर्वीच पेरले गेले

Education Scam : पाच लाखात मान्यता, दोन लाखात शालार्थ

Share:

Author

नागपूर शिक्षक घोटाळ्यात अनेक नवनवीन माहिती समोर येत आहे. मात्र माजी शिक्षक आमदाराने हा घोटाळा तीन वर्षांपूर्वीचा असल्याचे सांगितले.

काही दिवसांपूर्वी उघड झालेल्या बोगस शिक्षक भरती घोटाळ्याने राज्याच्या शिक्षण व्यवस्थेत एकच खळबळ उडवली आहे. मात्र या घोटाळ्याची मूळ कहाणी तीन वर्षांपूर्वी गोंदिया जिल्ह्यात सुरू झाली होती. तेव्हा तब्बल 55 बोगस मान्यता रद्द करण्यात आल्या होत्या आणि संबंधित शिक्षणाधिकारी व संस्थाचालकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते.

घटना समोर येताच, माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी या प्रकरणाची पुनश्च चौकशी व्हावी, दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई व्हावी, अशी मागणी पुन्हा एकदा जोरकसपणे पुढे रेटली आहे. शिक्षक परिषद जिल्हा कार्यवाह नाकाडे यांनी देखील सोमवारपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. हा संघर्ष आता राज्यभर पेटण्याची चिन्हं आहेत.

Chandrashekhar Bawankule : रेती व्यवहारात पारदर्शकतेचा शिडकाव

भ्रष्टाचाराचा बुरखा

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष आणि माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी 2022 मध्येच शिक्षण क्षेत्रातील बोगस भरतीबाबत आवाज उठविला होता. त्यांनी 15 जून 2022 रोजी शिक्षण आयुक्तांना दिलेल्या निवेदनात राज्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, अध्यापक विद्यालय, विद्यानिकेतने या संस्थांमध्ये झालेल्या भरतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते.

गाणार यांच्या निवेदनानुसार, वैयक्तिक मान्यता देताना शासन निर्णयाच्या अटींचे उघडपणे उल्लंघन केले गेले होते. मान्यतेच्या बदल्यात लाखो रुपये उकळण्यात आले. प्रत्येकी पाच लाखात शिक्षणाधिकाऱ्यांकडून मान्यता मिळाली तर दोन लाखांमध्ये शालार्थ आयडी मंजूर झाली, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता.

Maharashtra : भाजपने गाठला संघटन बांधणीचा नवा टप्पा

गोंदिया प्रकरणात कारवाई

गोंदिया जिल्ह्यातील 55 बोगस मान्यता रद्द करण्यात आल्या. संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु इतर जिल्ह्यांतील अशाच स्वरूपाच्या बोगस भरती प्रकरणांकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी बोगस भरती करणाऱ्यांना खतपाणी मिळाले आणि बेरोजगार युवकांची लुबाडणूक सुरूच राहिली. या प्रकरणांतून हजारो तरुणांचे भविष्य अंधारात टाकले गेले. अमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले गेले.

अन्यायाच्या छायेत काही जणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. त्यामुळे गाणार यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी ठाम भूमिका घेतली आहे. गेल्या काही वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात चाललेला अपप्रवृत्तींचा गोंधळ आता थांबविण्याची वेळ आली आहे. नागो गाणार यांच्या नेतृत्वात शिक्षक परिषद आता निर्णायक लढ्याच्या तयारीत आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या आंदोलनात राज्यभरातील शिक्षक संघटना सहभागी होण्याचे संकेत मिळत आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!