
बुलढाण्यात अवैध दारू तस्करांची मुजोरी शिगेला. पाठलाग करणाऱ्या रक्षकांची दुचाकी लाथ मारून पाडली, एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी.
बुलढाणा जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाचे सावट गडद होत चालले आहे. कायद्याचा धाक उरलेला नाही, असेच चित्र आता निर्माण झाले आहे. 23 मार्च रोजी, भरदुपारी एका धक्कादायक घटनेत अवैध दारू तस्करांनी पाठलाग करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला बळी घेतला. अंढेरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई भागवत गिरी यांना या तस्करांनी निर्दयपणे संपवले.
घटना दुपारी दीडच्या सुमारास चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ जवळ घडली. गस्त घालत असताना पोलीस शिपाई भागवत गिरी आणि त्यांचे सहकारी राम आंधळे यांनी अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोन जणांना एका दुचाकीवर जाताना पाहिले. संशय बळावल्याने त्यांनी पाठलाग सुरू केला. मात्र, या दुचाकीस्वार तस्करांनी अंगावर येणाऱ्या पोलिसांना थांबण्याऐवजी त्यांच्या दुचाकीला जोरात लाथ मारली. यामुळे पोलीस दुचाकीवरील ताबा सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन आदळली. यामध्ये भागवत गिरी यांचा जागीच मृत्यू झाला, तर राम आंधळे गंभीर जखमी झाले.

Devendra Fadnavis : शंकराच्या नगरीत गोदावरीच्या तीरावर सिंहस्थाची गुढी उभारली
गुन्हेगारांचा सुळसुळाट
अवैध दारू व्यावसायिकांची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कायद्याचा धाक न राहिल्याने आता गुन्हेगार पोलीस दलालाच लक्ष्य करू लागले आहेत. मृत्यूमुखी पडलेले भागवत गिरी आणि जखमी राम आंधळे हे दोघेही अंढेरा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. शिवणकर नावाचा एक कुख्यात दारू तस्कर मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक करत होता. पोलिसांना त्याच्या हालचालींची खबर मिळताच त्यांनी तातडीने कारवाई केली. पण, यावेळी शिवणकर आणि त्याच्या साथीदारांनी थेट पोलिसांवर हल्ला चढवला.
अपघातानंतर गंभीर जखमी असलेल्या राम आंधळे यांना तातडीने स्थानिक कृष्णा मिसाळ यांनी चिखली येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, पोलिसांच्या मृत्यूमुळे संपूर्ण जिल्हा पोलीस दल हादरून गेले आहे. घटनेनंतर शिवणकर घटनास्थळावरून पसार झाला आहे. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी विशेष पथके तयार केली आहेत.
Sushant Singh Rajput Case : अनिल देशमुख यांच्या भूमिकेला समर्थनार्थ निवेदन
सुरक्षा धोक्यात
पोलिसांना लक्ष्य करणाऱ्या या निर्ढावलेल्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई होईल का, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. पोलीस दलाच्या सुरक्षेवरच आघात होऊ लागल्याने कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने तत्काळ कठोर पावले उचलून अशा गुन्हेगारांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे, अन्यथा पोलिसांची सुरक्षा आणि नागरिकांचा विश्वास धोक्यात येऊ शकतो.
झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा पोलीस दल संतप्त झाले आहे. त्यांच्या सहकाऱ्याचा अशा पद्धतीने बळी जाणे, हे दुर्दैवी आणि लज्जास्पद आहे. कायदा राबवणाऱ्या पोलिसांवरच हल्ले होऊ लागल्यास सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा कशी राखली जाणार? पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणात मोहिम हाती घेतली आहे. अवैध दारू व्यवसायाविरोधात कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी पोलिस आणि स्थानिक नागरिक करत आहेत.
Jaykumar Gore : जोपर्यंत देवाभाऊ पाठीशी, माझं कुणी वाकडं करू शकत नाही