
सामाजिक समतेच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकत केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात हालचाली वाढल्या असून, भाजपचे माजी खासदार सुनील मेंढे यांनी याचे स्वागत केले आहे.
देशाच्या राजकारणात सध्या मोठ्या चर्चेचा विषय बनलेला जातनिहाय जनगणना हा निर्णय आता सामाजिक न्यायाच्या दिशेने एक ठोस पाऊल ठरत आहे. या निर्णयावर राजकीय वर्तुळात श्रेयवादाची लढाई सुरू आहे. मात्र सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात क्रेडिट घेण्यासाठी चाललेली स्पर्धा जनतेच्या हिताच्या मुद्द्यापासून दूर जात असल्याचे दिसून येत आहे. पण या निर्णयाचे महत्व आणि त्याचे दुरागामी परिणाम यावर चर्चा होत आहे. याच पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पार्टी भंडाऱ्याच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत माजी खासदार सुनील मेंढे यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे समाजातील मागासलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होईल आणि त्याच्या परिणामस्वरूप सामाजिक आणि आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करून त्यांचे कल्याण करण्यासाठी नवे मार्ग खुले होतील असे त्यांनी सांगितले.सुनील मेंढे यांनी स्पष्ट केले की, जातनिहाय जनगणना हा एक महत्त्वाचा निर्णय आहे. जो समाजाच्या विविध घटकांवर सकारात्मक परिणाम करेल. या जनगणनेमुळे मागासलेले घटक अधिक दिसून येतील. त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीचा खुलासा होईल, आणि त्यांना मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यासाठी योग्य धोरणे ठरवता येतील.

Political War : जनगणनेचा निर्णय परखड, पण ‘श्रेय’वादाचा कागद जड
मागास घटकांसाठी धोरणे
मेंढे म्हणाले की, या जनगणनेने समाजातील विविध जातींच्या स्थितीचे वस्तुस्थितीचे मूल्यांकन होईल, ज्यामुळे सरकारने त्यांच्याबाबत योग्य आणि समावेशक धोरणे राबवता येतील. माजी खासदारांनी हा निर्णय समाजाच्या मागासलेल्या घटकांसाठी एक मोठी संधी ठरेल असा विश्वास व्यक्त केला.सुनील मेंढे यांनी या निर्णयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला दिले. त्यांनी काँग्रेस पक्षावर टीका करत सांगितले की, 2006 मध्ये काँग्रेसने जातनिहाय जनगणनेचे आश्वासन दिले होते. पण त्याआधी असलेल्या सर्व जनगणनांमध्ये काही ना काही दोष होते. 2011 मध्ये जनगणना करण्यात आली.
परंतु त्यात मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळल्या आणि त्या अहवालाचा जाहीर वापरच केला गेला नाही. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने हा धाडसी निर्णय घेतला आहे. जो देशातील सामाजिक आणि आर्थिक सुधारणा करण्याच्या दिशेने एक महत्वाची पाऊल आहे. सुनील मेंढे यांनी यावर भर दिला की, केंद्र सरकारने जात निहाय जनगणना शास्त्रशुद्ध पद्धतीने केली आहे, ज्यामुळे त्रुटी टाळता येणार आहेत.या पत्रकार परिषदेत सुनील मेंढे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, हा निर्णय समाजाच्या सर्व घटकांवर चांगला प्रभाव टाकेल आणि सामान्य जनतेला त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.
Farmer Loan Waiver : पश्चिम विदर्भात गडगडला उद्धव ठाकरे गटाचा ट्रॅक्टर
या निर्णयामुळे विविध जातींच्या मागासलेल्या स्थितीचा खुलासा होईल आणि त्यांना समान संधी देण्यासाठी पावले उचलता येतील. पत्रकार परिषदेत डॉ. उल्हास फडके, प्रदीप पडोळे, आशु गोंडाने आणि सूर्यकांत ईलमे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Navneet Rana : विहिरीत, पाण्याच्या टाकीवर चढणाऱ्यांचे दिवस गेले