महाराष्ट्र

डॉ. विलास डांगरेंसह महाराष्ट्रातील 14 दिग्गजांना Padma Awards जाहिर

केंद्र सरकारकडून Republic Day च्या पूर्वसंध्येला घोषणा

Author

केंद्र शासनाने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रतील 14 दिग्गजांचा सामावेश आहे.

केंद्र सरकारकडून 25 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. याद्वारे विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दिग्गजांना सन्मानीत करण्यात आले आहे. देशातील विविध ठिकाणी आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांचा या पुरस्कारांमध्ये समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केलेल्या भाषणानंतर या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

राष्ट्रपतींनी द्रौपदी मुर्मू यांनी एकूण 139 जणांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये सात दिग्गजांना पद्म विभूषण, 19 दिग्गजांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. तर 113 जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या 139 दिग्गजांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील 14 जणांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील तीन दिग्गजांना पद्मभूषण व 11 दिग्गजांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

या पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे, मारूती चित्तमपल्ली यांचा समावेश आहे. तसेच शैली होळकर, डॉ.नीरजा भाटला, भीमसिंह भावेश, थविल वादक पी.दत्चनमूर्ती, शेखा एजे अल सबा, एल हँगथिंग, भैरूसिंग चौहान, जगदीश जोशीला, सेनानी लिबिया लोबो सरदेसाई, हरविंदर सिंग यांना देखील पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.

मंत्र्यांच्या कामांबाबत Devendra Fadnavis झालेत कठोर

डॉ.विलास डांगरे हे नागपूरचे प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ञ आहेत. मागील अनेक वर्षांपासून डॉ. डांगरे यांनी वैद्यकीय सेवा दिल्या आहेत. आतापर्यंत जवळपास एक लाखांपेक्षा जास्त रुग्णांवर डॉ. विलास डांगरे यांनी उपचार केले आहेत. गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांवर ते उपचार करतात. त्याचबरोबर मारुती चितमपल्ली यांनाही पद्मश्री जाहीर झाला आहे. मारुती चितमपल्ली हे ज्येष्ठ साहित्यिक आहेत. चितमपल्ली हे वन्यजीव प्रेमी आहेत. ते वन आणि वन्यजीवाच्या संवर्धनासाठी काम करतात. मराठी चित्रपटातील अभिनेते अशोक सराफ यांचा देखील या यादीत सामावेश आहे. मागच्या वर्षी अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या वर्षी अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

या दिग्गजांना पुरस्कार जाहिर

पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये महाराष्ट्रातील तीन दिग्गजांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मनोहर जोशी , पंकज उधास आणि शेखर कपूर या तीन दिग्गजांना पद्मभूषण पुरस्कार जाहिर झाले आहे. तर राज्यातील 11 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहिर झाले आहे. यामध्ये अच्युत पालव – कला, अरुंधती भट्टाचार्य – व्यापार आणि उद्योग, , डॉ. विलास डांगरे – औषधी, अशोक सराफ – कला, अश्विनी भिडे देशपांडे – कला, चैतराम देवचंद पवार – समाजसेेवा, जसपिंदर नरुला – समाजसेवा, अरण्यऋषी मारुती चितमपल्ली – साहित्य आणि शिक्षण, ⁠राजेंद्र मुजुमदार – कला, सुभाष शर्मा – कृषणी आणि वासुदेव कामत – कला यांचा समावेश आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!