महाराष्ट्र

Pahalgam Attack : माध्यमांच्या थेट रिपोर्टिंगवर बंदी 

Central Government : सुरक्षा दलांच्या हालचालींचे प्रसारण केल्यास होणार कारवाई

Author

देशाच्या सुरक्षेला प्राधान्य देत भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता संरक्षण दलांच्या कारवायांचे थेट प्रक्षेपण किंवा रिअल टाइम रिपोर्टिंग पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांत जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे अमरनाथ यात्रेच्या मार्गावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात पुन्हा एकदा सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने देशातील सर्व प्रसारमाध्यमांना आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांना नवे आदेश जारी केले आहे. संरक्षण दलांच्या कारवाया व ऑपरेशन्सचे थेट प्रक्षेपण न करण्याचा सल्ला दिला आहे.

सरकारच्या आदेशानुसार, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. संरक्षण दलांचे ऑपरेशन्स, गुप्त माहिती आणि कारवाया याबाबत कोणतीही ‘रिअल टाइम’ रिपोर्टिंग, व्हिज्युअल्सचे थेट प्रक्षेपण किंवा ‘सूत्रांच्या हवाल्याने’ दिली जाणारी माहिती यापासून दूर राहण्याचा स्पष्ट निर्देश देण्यात आला आहे. सध्या जम्मू-कश्मीरच्या पवळगाम भागात अमरनाथ यात्रेच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या सुरक्षाबळांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याने देश हादरला आहे. या हल्ल्यात अनेक जवान जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर आहे. ही घटना याची जाणीव करून देते की कोणतीही संवेदनशील माहिती सार्वजनिक झाल्यास, शत्रुत्वाची भावना बाळगणाऱ्या घटकांना मदत होऊ शकते. त्यामुळे अशा प्रसंगी माध्यमांनी अधिक जबाबदारीने आणि संयमाने वागणे अत्यावश्यक आहे.

Yavatmal : कोट्यवधींचा जल प्रकल्प, तरीही धनजवासीय तहानलेले  

स्पष्ट संदेश

याआधीही कारगिल युद्ध (1999), मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ले आणि कंधार विमान अपहरणाच्या वेळी माध्यमांकडून झालेल्या अनियंत्रित कव्हरेजमुळे राष्ट्रीय सुरक्षेला मोठा फटका बसल्याचे सरकारने निदर्शनास आणले आहे. अशा घटनांमध्ये थेट प्रक्षेपणामुळे शत्रू गटांना भारतीय फौजांच्या हालचालींची माहिती मिळाली आणि त्यामुळे संकट वाढले. सरकारने स्पष्ट केले आहे की, एखाद्या संरक्षण कारवाईदरम्यान केवळ अधिकृत आणि नामांकित सरकारी अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीलाच माध्यमांमध्ये प्रसिद्धी द्यावी. कारवाई पूर्ण होईपर्यंत कोणतीही अंदाजे माहिती किंवा अप्रमाणित सूत्रांचे हवाल्याने बातम्या देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने प्रसारमाध्यमांना पुन्हा एकदा लक्षात आणून दिले आहे की, राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत त्यांच्या भूमिकेचे अत्यंत महत्त्व आहे. मीडिया संस्थांनी आणि नागरिकांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या संवेदनशीलतेची पूर्ण जाणीव ठेवून, कोणतीही बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी तिचा परिणाम विचारात घ्यावा.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!