महाराष्ट्र

Chandrapur : तेंदूपत्त्यासाठी जंगलाची होळी

Vidarbha : वनहक्क समितीच्या पदाधिकाऱ्यांचा धक्कादायक कारनामा उघड

Author

चंद्रपूरमध्ये तेंदूपत्ता मिळवण्यासाठी जंगलाला आग लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वनहक्क समितीचे अध्यक्ष आणि सचिव यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वन हक्क समितीचे अध्यक्ष आणि सचिव यांनी स्वतःच तेंदूपत्ता मिळवण्यासाठी जंगलाला आग लावल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार उघडकीस आल्याने वनखात्याने कठोर कारवाई करत दोघांनाही अटक केली आहे. विशेष म्हणजे, जंगलात वणवे लावून तेंदूपत्ता संकलन करण्याचा हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे, मात्र यापूर्वी कोणीही रंगेहात सापडले नव्हते.

घटनेत धनराज बाळकृष्ण उईके (वय 37, बोथिया, रामटेक) आणि दिनकर लक्ष्मण उईके (वय 34, फुलझरी, रामटेक) या दोघांना अटक करण्यात आली आहे. सूरज नागोराव कंगाली (वय २४, बोथिया, रामटेक) हा देखील या कटात सामील होता. सध्या तिघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.

Belora Airport : देवाभाऊंच्या उपस्थितीत अमरावतीच्या आकाशात पूर्ण वेळ टेकऑफ

कृत्रिम वणवा

 

वनविकास महामंडळ आणि प्रादेशिक पवनीच्या जंगलात हा प्रकार घडला. जंगलात अधिक चांगला तेंदूपत्ता तयार व्हावा म्हणून काही स्थानिक आग लावण्याचा प्रयत्न करत असतात. यावेळीही जंगलात कृत्रिम वणवा लावण्यासाठी एक विशिष्ट पद्धत वापरण्यात आली. प्रथम, जंगलातील वाळलेल्या पानांचा ढीग गोळा केला जातो. त्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवण्याऐवजी त्याठिकाणी एक उदबत्ती पेटवून ठेवली जाते. ही उदबत्ती जळत राहते आणि हळूहळू संपूर्ण भाग आगीच्या लपटांमध्ये सापडतो.

घडलेल्या प्रकारामुळे जवळपास 25 ते 30 हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे. तेंदूपत्ता गोळा करून गडचिरोली जिल्ह्यातून आंध्र प्रदेशातील ठेकेदारांकडे पाठवला जातो. आंध्र प्रदेशातील विडी निर्मिती कारखान्यांसाठी हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे जंगल जाळून तेंदूपत्ता मिळवण्याच्या या दुष्टचक्रात स्थानिक लोकांचा सहभाग असतो.

Parinay Fuke : तस्कर, अधिकाऱ्यांवर येत्या काही तासात कारवाई; सीएमचे आदेश

जुन्या पद्धतींमुळे गैरसमज

 

ग्रामीण भागात शेतीसाठी जुने पद्धतींचा अवलंब केला जातो, त्यातीलच एक म्हणजे गायरानातील गवत जाळण्याचा प्रकार. अनेक गावकरी असा समज करून घेतात की, गवत जाळल्यास पुढील पावसाळ्यात ते अधिक जोमाने उगवते. त्यामुळेच डोंगर उतारावरील गवत, पालापाचोळा जाळण्याचे प्रकार वारंवार घडतात. मात्र, यामुळे जंगल आणि वन्यजीवांचे मोठे नुकसान होते.

कायद्यानुसार, जंगलाला वणवा लावणाऱ्या व्यक्तीस सहा महिने कैद आणि पाचशे रुपयांचा दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. मात्र, अजूनही या प्रकारांवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलेले नाही. यामुळे वनविभागासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!