महाराष्ट्र

BJP : हर्षवर्धन सपकाळ रिकामे, पद टिकविण्यासाठी नाटकांची यात्रा 

Chandrashekhar Bawankule : राजकीय फोटोज आणि निवडणुकीसाठी शेतकऱ्यांचा वापर 

Author

काँग्रेसची पदयात्रा म्हणजे केवळ राजकीय नौटंकी आहे, असा घणाघात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. नागपुरात त्यांनी काँग्रेस आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर जोरदार टीका करत खरडपट्टी काढली. 

काँग्रेसला 65 वर्षात जे काही करता आलं नाही, त्यावर आता राजकारण करत आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर काँग्रेस केवळ राजकीय पोळी भाजत आहे, असा जळजळीत घणाघात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर केला. आगामी 3 जूनला यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे काँग्रेसकडून आयोजित करण्यात येणाऱ्या ‘किसान आत्मसम्मान पदयात्रे’ वर बोलताना बावनकुळे यांनी काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर सडकून टीका केली.

बावनकुळे म्हणाले, 2014, 2019 आणि आता 2024 तीनही निवडणुकीमध्ये भाजपाने शेतकऱ्यांसाठी जे वचन दिलं, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही प्रत्यक्षात उतरवत आहोत. पण काँग्रेसने 65 वर्षांच्या सत्ताकाळात शेतकऱ्यांसाठी केवळ भाषणे आणि आश्वासनांची दुकानं उघडली होती. ते पुढे म्हणाले, आज आमची डबल इंजिन सरकार, केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या हितासाठी हजारो कामं करत आहे. 12 हजार रुपये वार्षिक थेट खात्यात देणं, कृषीपंपांसाठी मोफत वीज योजना, मोठ्या रस्त्यांची उभारणी, फसल विमा योजना. यांसारख्या पायाभूत योजनांवर आम्ही काम करत आहोत.

दिशाभूल करण्याचा प्रयत्न

काँग्रेसवर टीका करताना त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांचा उल्लेख करत सांगितले की, सपकाळ हे सध्या रिकामे आहेत. त्यामुळे त्यांच्या हातात काही काम नाही. जसं राहुल गांधी ‘यात्रा’ काढतात पण कोणीही त्यांना भाव देत नाही, तसंच हे देखील आहे. सपकाळ पद टिकवण्यासाठी राहुल गांधींना काहीतरी क्लिप्स पाठवायच्या म्हणून असे हास्यास्पद आणि दिशाभूल करणारे बयान देत आहेत. शेतकऱ्यांमध्ये चुकीची माहिती पसरवून, त्यांच्या भावना चिघळवून राजकारण करणं ही काँग्रेसची सवय झाली आहे. त्यांचं कुठलंच ठोस काम आजवर न दिसता केवळ राजकीय नौटंकी आणि फोटोंच्या क्लिप्स बनवण्यावर भर असतो. आमचा उद्देश फक्त प्रचार नाही, तर शेतकऱ्यांना स्थायिक मदत देणं आहे.

Sanjay Rathod : डेहणी प्रकल्पाच्या माध्यमातून सात हजार हेक्टर सिंचन

65 वर्ष शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारे आता आत्मसम्मानाचं नाव घेऊन तोंड वाचवत आहेत, अशा शब्दांत बावनकुळे यांनी काँग्रेसच्या आंदोलनावर तिरकस टिप्पणी केली. पत्रकार परिषदेत त्यांनी एकप्रकारे काँग्रेसच्या ‘पदयात्रे’ची खिल्ली उडवत हे देखील म्हटलं की, ज्या पक्षाने चार दशकं राज्य करून शेतकऱ्यांना कर्जबाजारी, आत्महत्येच्या खाईत लोटलं, ते आज शेतकऱ्यांचा आत्मसन्मान सांगत आहेत हेच एक मोठं विडंबन आहे. राज्य सरकारने आगामी तीन वर्षांत शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा संकल्प केला आहे आणि तो पूर्ण करणारच. हे सगळं काँग्रेसला पाहावत नाही, म्हणून ते अशा भ्रम निर्माण करणाऱ्या यात्रांचा आधार घेत आहेत, असे बावनकुळे म्हणाले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!