
नागपूर जिल्ह्यातील मागील वर्षाच्या नियोजन समितीच्या बैठकीत तात्कालीन पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही सूचना दिल्या होत्या. त्यांचे पालन न केल्याने चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
नागपुरात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. मागील वर्षी नियोजन समितीच्या बैठकीच्या वेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे पालकमंत्री होते. त्यावेळी फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या होत्या. त्या सूचनांचे विविध विभागातील अधिकाऱ्यांनी पालन केले नाही. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना खडसावले.
मागील वर्षी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तत्कालीन पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या होत्या. त्या सुचनांचे किती पालन झाले आहे, त्या संदर्भात विविध विभागांनी व अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली आहे, याची माहिती विद्यमान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारली. परंतु त्या संदर्भात समाधानकारक उत्तर अनेक अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांजवळ नाराजी व्यक्त केली.

अधिकाऱ्यांची केली तक्रार
लोकप्रतिनिधींनी मागील वर्षाच्या नियोजन समितीच्या बैठकीत दिलेल्या सूचनांचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांची ही वृत्ती योग्य नाही, असे सांगत बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली. एवढंच नव्हे तर बैठक तू असतानाच चंद्रशेखर बावनकुळेंनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. संपर्क साधून नागपुरातील काही अधिकाऱ्यांची तक्रार सुद्धा केली, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
नागपुरातील नियोजन समितीच्या बैठकीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बावनकुळेंनी मागील बैठकीत तत्कालीन पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनांचे अधिकाऱ्यांनी योग्यरित्या केले नसल्याचे मान्य केलं. त्यामुळेच अधिकाऱ्यांची कानउघडनी केल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी लवकरच लोकप्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, अशी अपेक्षा चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्राला डावलण्याचा डाव? Ambadas Danve यांची फडणवीसांवर टीका!
पुन्हा दिले निर्देश
हे खरं आहे की मागील बैठकीच्या अनुपालनामध्ये आमचे प्रशासन कमी पडले होते. मागील बैठकीत ज्या काही सूचना फडणवीस यांनी दिल्या होत्या. त्याचे योग्य पालन करण्यात आले नाही, हे आजच्या बैठकीत लक्षात आल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. कदाचित निवडणुकीमुळे ते अनुपालन करण्यामागे मागे पडले असतील, परंतु असे व्हायला नको होते. आज अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींच्या सूचनावर अनुपालन करण्याचे निर्देश नव्याने देण्यात आले आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, “जलजीवन मिशनमध्ये मोठा भ्रष्टाचार आहे. त्याच्या चौकशीसाठी आम्ही सर्व प्रकरण इओडब्ल्यू किंवा विशेष एसआयटी नेमून त्यांच्याकडे देण्याचा विचार करत आहोत. महिन्याभरात या संदर्भात काही ठोस गोष्टी समोर येतील.