महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : शिंदे, महाजन एकत्र कार्यरत आहेत

Pahalgam Attack : सरकारच्या मदतीत राजकारण नाही, फक्त एकजुटीचा हेतू

Author

काश्मीर पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सरकारकडून मदत पुरविली जात आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या काश्मीर जाण्याच्या हेतूची चर्चा होत असतांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. माओवादी हल्लेखोरांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात 28 निष्पाप पर्यटकांना जीव गमवावा लागला. हल्ल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकार तातडीने कामाला लागले असून, जम्मू-कश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित परत आणण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन यांनी थेट श्रीनगर गाठून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. मात्र शिंदे काश्मीरला गेल्याने आता वादाची ठिणगी पेटली आहे. यावर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गिरीश महाजन असतांना शिंदे का गेले असा सवाल उपस्थित होत आहे. यावरच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं की, सरकारमध्ये कुठेही मतभेद नाहीत आणि एकसंधपणे सर्वजण या राष्ट्रीय संकटात काम करत आहेत. शिंदे पक्षनेते म्हणून गेले असून, गिरीश महाजन आपत्ती व्यवस्थापनासाठी तिथे उपस्थित आहेत. व्हीआयपी हालचाली कमी ठेवण्यासाठी मर्यादित लोकांनाच पाठवण्यात आले आहे, असंही त्यांनी नमूद केलं. या गंभीर प्रसंगात राजकीय टीका-टिप्पणी न करता सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले. त्यांनी यावेळी शिंदे आणि महाजन यांचं संयुक्तपणे केलेलं कार्य कौतुकास्पद असल्याचं सांगितलं.

Parinay Fuke : पाकिस्तानच्या प्रत्येक हस्तक्षेपाचा अंत हवा

सर्वपक्षीय सहकार्याची गरज

मुख्यमंत्री शिंदे यांच्या श्रीनगर भेटीवर विरोधकांकडून सवाल उपस्थित केले जात आहेत. जेव्हा गिरीश महाजन आधीच तिथे आहेत, तेव्हा शिंदे गेलेच कशासाठी? असा सवाल उपस्थित करत काहींनी प्रशासनावर ताण वाढत असल्याचा मुद्दा मांडला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही शिंदेंच्या कार्यपद्धतीवर आणि नरेश म्हस्के यांच्या पहिल्यांदाच विमानात बसले या विधानावर नाराजी व्यक्त केली. ही वेळ मदतीची आहे, स्वतःचं मार्केटिंग करण्याची नाही, असं ते म्हणाले. या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलली आहेत. भारत-पाकिस्तानमधील सिंधू नदी पाणी वाटप करार तात्काळ रद्द करण्यात आला आहे.

दोन्ही देशांमध्ये तणाव पुन्हा वाढण्याची चिन्हं आहेत. इंडिगोच्या अतिरिक्त विमानाद्वारे अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी सरकार सज्ज आहे. स्थानिक प्रशासन, केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि महाराष्ट्र सरकार एकत्रितपणे कार्यरत आहेत. मृतांच्या पार्थिवांनाही महाराष्ट्रात परत आणलं जात असून, मृतांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी सरकारने विशेष पावलं उचलली आहेत. ही केवळ एक दहशतवादी घटना नाही, तर राष्ट्रीय शोक आहे. त्यामुळे सर्वपक्षीय सहकार्य आणि सहवेदनेची गरज आहे. सरकारचा कोणताही निर्णय श्रेयासाठी नाही, तर जनतेच्या सुरक्षेसाठी आहे, असा ठाम विश्वास राज्य सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे.

­Mohan Bhagwat : शक्ती सादर करणे, हेच अंतिम सत्य 

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!