महाराष्ट्र

देवाभाऊच्या गावात बावनकुळेंना Republic Day संधी

पालकमंत्र्यांना करावं लागणार फक्त National भाषण

Author

यंदाचा प्रजासत्ताक दिन महाराष्ट्रासाठी काहीसा वेगळा ठरणार आहे. राज्य सरकारने मोठ्या थाटामाटात हा दिवस साजरा करण्याची तयारी झाली आहे. 

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रजासत्ताक दिनी एकाच वेळी ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या नियोजनातील काही बाबी सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. सरकारचा प्रमुख फोकस मुंबईतील शिवाजी पार्क येथे होणाऱ्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमावर आहे. येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन ध्वजारोहण करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लावणार आहेत. प्रजासत्ताक दिन सोहळा आयोजित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आले आहेत. ध्वजारोहण समारंभात राष्ट्रध्वजाला वंदन करताना सर्वप्रथम राष्ट्रगीत आणि त्यानंतर राज्यगीत वाजवण्यात येणार आहे.. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भाषण करावे किंवा नाही, याचा निर्णय त्यांनी स्वतः घ्यावा, असं परिपत्रक काढण्यात आलं आहे.

सलामीच्या वेळी सज्ज असलेला बॅन्ड सलामीपूर्वी आणि सलामीनंतर वाजवण्यात हरकत नसेल. राष्ट्रध्वज लावण्याची योग्य पद्धतही पुन्हा एकदा स्मरण करून देण्यात आली आहे. ध्वजारोहणाच्या पूर्वतयारीसाठी रंगीत तालीम सध्या राज्यभरात सुरू आहे. राष्ट्रध्वज सन्मानाने लावला जाईल आणि वेळेवर उतरवला जाईल याची दक्षता घेण्याचे सक्त आदेश आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू केलं आहे. त्यानुसारही घरोघरी ध्वज लावण्यास आता परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी राष्ट्रध्वज विषयक कायद्यात शिथिलताही देण्यात आली आहे.

मंत्र्यांच्या कामांबाबत Devendra Fadnavis झालेत कठोर

मोजकेच बोलावं लागणार

प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी व व्यक्तींनी राष्ट्रीय पोशाख परिधान करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि इतर सर्व विभागाचे अधिकारी ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त वृक्षारोपण, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा, देशभक्तीपर निबंध आणि कविता स्पर्धाही घेता येणार आहेत. प्रभात फेरी काढल्या जाणार आहेत. मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात व्यासपीठावर मंत्र्यांना सरकारी भाषण करावं लागणार आहे. राजकीय विषयावर त्यांना बोलता येणार नाही. कोणत्याही राजकीय किंवा योजनेसंदर्भातील भाष्य त्यांना करता येणार नाही. महत्वाची घोषणाही करता येणार नाही.

ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ध्वजारोहण करतील. पण्ुयात उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्य पाहुणे असतील. देवाभाऊंच्या नागपुरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे ध्वजारोहण करणार आहे. अहिल्यानगर राधाकृष्ण विखे पाटील यांना बहुमान देण्यात आला आहे. वाशिममध्ये हसन मुश्रीफ, सांगलीत चंद्रकांत पाटील, नाशिकमध्ये गिरीश महाजन ध्वजारोहण करतील. पालघरमध्ये गणेश नाईक, जळगावात गुलाबराव पाटील शासकीय सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असतील. यवतमाळमध्ये संजय राठोड ध्वजारोहण करतील. मुंबई शहर मंगलप्रभात लोढा, मुंबई उपनगर ॲड.आशिष शेलार यांना ध्वजारोहणारचा मान मिळाला आहे.

रत्नागिरीत उदय सामंत, धुळ्यात जयकुमार रावल, जालन्यात पंकजा मुंडे, नांदेडमध्ये अतुल सावे, चुद्रपुरात डॉ. अशोक उईके हे ध्वजारोहण करतील. साताऱ्यात शंभुराज देसाई, बीडमध्ये दत्तात्रय भरणे, रायगडमध्ये अदिती तटकरे ध्वजारोहण करतील. लातूरमध्ये शिवेंद्रसिंह भोसले, नंदुरबारमध्ये ॲड माणिकराव कोकाटे, सोलापूरमध्ये जयकुमार गोरे, हिंगोलीत नरहरी झिरवाळ शासकीय कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. भंडाऱ्यात संजय सावकारे. छत्रपती संभाजीनगर येथे संजय शिरसाट, धाराशिवमध्ये प्रताप सरनाईक मुख्य शासकीय सोहळ्यात सहभागी होतील.

बुलढाण्यात मकरंद जाधव (पाटील), सिंधुदुर्गमध्ये नितेश राणे, अकोल्यात आकाश फुंडकर, गोंदियात बाबासाहेब पाटील ध्वजारोहण करतील. कोल्हापुरात प्रकाश आबिटकर, वर्ध्यात पंकज भोयर, परभणीत मेघना साकोरे-बोर्डीकर, अमरावतीत राज्यमंत्री इंद्रनील नाईक ध्वजारोहण करणार आहे. देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात ॲड. आशिष जयस्वाल हे ध्वजारोहण करतील. जयस्वाल हे गडचिरोलीचे सहपालकमंत्री आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!