महाराष्ट्र

दावोसमध्ये एका चिमुकल्याने मारला Devendra Fadnavis यांचा ‘मी पुन्हा येईन’ हा डायलॉग 

संमेलनाच्या उद्घाटनादरम्यान मुख्यमंत्र्यांचे प्रसन्नचित्त भाषण 

Author

तिसरे विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटनानिमित्त देवेंद्र फडणवीस यांचे भाषण. मराठी माणूस कलहशील असल्याचे फडणवीस म्हणाले.

पुणे जिल्ह्यात राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत तिसरे विश्व मराठी संमेलन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी फडणवीसांनी उपस्थितांना संबोधित करताना प्रसन्नचित्त भाष्य केले. यावेळी विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने उद्भवलेल्या वादावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले.

मुख्यमंत्री म्हणाले, “साहित्य संमेलन असो, नाट्य संमेलन असो किंवा विश्व मराठी साहित्य संमेलन असो, जर त्या ठिकाणी वाद निर्माण झाला नाही तर ते संमेलन असूच शकत नाही. वाद निर्माण करणे हा आपला स्थायी भाव असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. कारण आपण भावनाप्रधान आणि संवेदनशील लोक आहोत. त्यामळे वाद-प्रतिवाद हा झालाच पाहिजे. यातूनच खऱ्या अर्थाने मंथन होत असते, असेही फडणवीस म्हणाले.

अनागोंदी कारभाराचा Devendra Fadnavis यांच्यावर आरोप 

आठव्या शतकातील पुस्तकाचा दाखला

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बोलत असताना आठव्या शतकातील एका पुस्तकाचा दाखला दिला. ज्यामध्ये मराठी माणसाचे गुण आणि अवगुण यांच्याबाबत माहिती लिहली आहे. मराठी माणूस हा कलहशील आहे, असे आठव्या शतकात लिहून ठेवलेले आहे. मराठी माणसाला कलह करायला आवडतो. म्हणून आपण संमेलन आयोजित करण्याचे थांबणार नाही. अशा संमेलनातूनच चांगले काम करण्याची शक्ती आणि बुद्धी आपल्याला मिळत असते, असे फडणवीस म्हणाले.

मंत्री उदय सामंत यांनी वादाच्या पुढे जाऊन विश्व मराठी संमेलन आयोजित करून दाखविले. त्याबद्दल उदय सामंत यांचे फडणवीस यांनी आभार प्रकट केले. जगभरात असा एकही देश नाही, जिथे मराठी माणूस पोहोचलेला नाही. आम्ही कोणत्याही देशात दौऱ्यासाठी गेलो तर तिथे लांबून लांबून स्वागतासाठी मराठी माणसे येतात. हे बघितल्यावर अतिशय आनंद मनाला वाटतो. काही दिवसांपूर्वी दावोस दौऱ्यावर गेलो असताना तिथे सुध्दा काही मराठी बांधवांनी माझे स्वागत केले. एका चिमुकल्या मुलाने “लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी…”, हे गीत अतिशय सुंदर पद्धतीने सादर केले. त्यामध्ये त्याने मी पुन्हा येईन.. असेही म्हटले”, अशी आठवण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.

मी पुन्हा येईन

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य आता माझा पाठलाग सोडतच नाही. परंतु हल्ली हे वाक्य चांगल्या अर्थाने म्हटलं जात आहे. मागील काळात हे उपहासाने म्हटले जायचे. एखादा शब्द जेव्हा आपल्याला चिकटतो तेव्हा काळ आणि वेळेनुसार त्याचे अर्थ बदलत जातात. पण विश्व मराठी संमेलनासाठी आज आलेल्या लोकांनी हे ठरविले पाहिजे की, जेव्हा जेव्हा विश्व मराठी संमेलन आयोजित केले जाईल, तेव्हा तेव्हा मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन…” हे धोरण लक्षात ठेवले पाहिजे, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला केले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!