महाराष्ट्र

Devendra Fadnavis : महापालिकेच्या गाभाऱ्यात सत्ता स्थापनासाठी ‘देवेंद्र मंत्र’ 

Local Body Elections : बॅकलॉगच्या जखमा भरण्यासाठी भाजपकडून विकासाचं इंजेक्शन 

Share:

Author

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना महापालिका जिंकण्याचे आवाहन केले आहे. बॅकलॉग भरायचा असेल, तर परिवर्तन अनिवार्य, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.

राजकारणात नवा जोश, नव्या दिशा, आणि स्पष्ट निर्धार घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांमध्ये जो आत्मविश्वास ओतला, तो आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी निर्णायक ठरणार आहे. वसई येथे आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांनी कार्यकर्त्यांना कान मंत्र दिला आणि संपूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रणांगणात उतरावं, असं स्पष्ट सांगितलं.

विधानसभेत परिवर्तन घडवून स्नेहा दुबे पंडित यांनी वसई-पालघरमधील जनतेचा विश्वास संपादन केला. मात्र आता केवळ विधानसभा पुरेसे नाही, तर महानगरपालिकेचे राजकारण जिंकून विकासाचा गतीमान मार्ग खुला करावा लागेल, असं ठाम मत फडणवीसांनी मांडलं. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, पाच वर्षांत गेल्या वीस वर्षांचा बॅकलॉग भरून काढायचा आहे, आणि त्यासाठी महापालिकेचा ताबा आवश्यक आहे.

ठाम भूमिका

फडणवीस म्हणाले, तुमच्या परिवर्तनाची गुरूकिल्ली महानगरपालिकेत दडलेली आहे. ती तुमच्या हाती आली तरच तुमची स्वप्नं साकार होतील. अन्यथा ती स्वप्नं दरवाजाजवळ येऊन थांबतील, उंबरठा ओलांडू शकणार नाहीत. या विधानातच त्यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट इशारा दिला. निवडणुकीची वेळ ही विश्रांतीसाठी नाही, तर झपाटून कामासाठी आहे.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘देवा भाऊ जिंदाबाद’, अशा घोषणा दिल्या. यावेळी फडणवीस थांबले आणि म्हणाले, फक्त घोषणा देऊन चालणार नाही, हे बॅकलॉगचे ओझं उतरवायचं असेल तर तुमचं कामच बोललं पाहिजे. या वाक्याने उत्साही गर्दीत एकच ऊर्जा संचारली आणि पुढील निवडणुकीत भाजपचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा निर्धार अधिक मजबूत झाला.

Bhandara : दुधातून वाहिलं विरोधी आमदारांच्या युतीचं नवं समीकरण 

विकासाची गती 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालघर दौऱ्यावर असताना त्यांनी एकाच दिवसात विविध विकासकामांचे उद्घाटन केले. प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाचा शुभारंभ, शालेय विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ, बांबू लागवड उपक्रम, वाढवण बंदरावरील चर्चा सभा. तसेच वसई विरार महापालिकेच्या डीएम पेटिट रुग्णालयाचा विस्तार आणि बोळींज पोलिस ठाण्याचे तसेच एसीपी व डीसीपी कार्यालयाच्या ऑनलाइन प्रणालीचे उद्घाटन या कार्यक्रमांनी दौऱ्याला विकासाची गती दिली.

दुसरीकडे, मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनानेही जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबईतील सेना भवन येथे शाखाप्रमुखांची बैठक पार पडली. ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश दिले की, प्रत्येक कार्यकर्त्याने दररोज 300 मतदारांच्या घरी जाऊन पक्षाची कामगिरी पोचवा आणि जनसंपर्क मजबूत करा. त्यांनी ही देखील स्पष्ट केलं की, शिवसेना सोडून गेलेल्या मंडळींना त्यांच्या जागा दाखवण्याची वेळ आली आहे.

राजकीय रणसंग्राम 

फडणवीसांच्या धगधगत्या भाषणातून कार्यकर्त्यांमध्ये जो आत्मविश्वास निर्माण झाला, तो ही निवडणूक केवळ स्पर्धा नाही, तर भविष्यासाठीचा आराखडा ठरवणार असल्याचे अधोरेखित करतो. आमदार स्नेहा दुबे पंडित यांचे कार्यकर्त्यांशी नाते आता केवळ जनसंपर्कापुरते मर्यादित नसून, ते विकासाचा रस्ता खुले करणारे ठरणार आहे. जनतेचा विश्वास जिंकण्याचे काम विधानसभेत झाले, आता महानगरपालिकेच्या माध्यमातून तो विश्वास कृतीत उतरवायचा आहे. राजकारणाचा संघर्ष सुरू आहे, पण आता जनता पाहतेय कोण ठाम उभा राहतो, कोण झपाटून काम करतो. आता ‘परिवर्तन’ हा शब्द घोषणा नाही, तर संकल्प झाला पाहिजे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!