महाराष्ट्र

Akola : नितीन गडकरींच्या व्हिजनला अकोल्यात हळूहळू मिळतोय वेग 

Development Projects : रस्त्यांपासून सुरू होत आहे विकासाची आशा 

Share:

Author

अकोल्याच्या ग्रामीण भागात डांबरी रस्त्यांमुळे विकासाची नवी वाट खुली होत आहे. अंधारलेल्या दळणवळण व्यवस्थेला आता उजळ भविष्याची दिशा मिळू लागली आहे.

अकोला जिल्ह्याचा ग्रामीण पट्टा म्हणजे आजही मागासलेपणाचं प्रतीक मानलं जातं. खडडखडीत रस्ते, अपुरी वाहतूक सुविधा आणि वेळेचं सततचं नुकसान हे या भागाचं वास्तव आहे. मात्र, आता हे चित्र बदलण्याची नांदी वाजली आहे. ग्रामीण भागात रस्त्यांचं जाळं विस्तारलं जात आहे. त्यातून विकासाची चाहूल लागू लागली आहे. अकोल्यासारख्या अविकसित जिल्ह्यातून बदलाच्या सुरुवातीचं दर्शन ग्रामीण जनतेला होऊ लागलं आहे.

तत्कालीन पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी ग्रामीण भागाला मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी ‘प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना’ची संकल्पना मांडली. या दूरदृष्टीला नितीन गडकरी यांनी कृतीत उतरवताना महाराष्ट्रातील ग्रामीण रस्त्यांना खराखुरा प्राण दिला. याच योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यातील अनेक मार्गांचे जाळे विस्तारले. गडकरींच्या पुढाकारामुळे आजही रस्त्यांच्या कामांना गती मिळत आहे.

बदल घडवणारा टप्पा

महायुतीच्या काळात सुरू झालेली ‘मुख्यमंत्री सडक योजना’ म्हणजे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील जीवनशैलीत बदल घडवणारी मोहीम. सांगूलद ते अनकवाडी, आपा, तापा मार्गाचा विकास या योजनेंतर्गत होऊ लागला आहे. या रस्त्याचे भाजपा आमदार रणधीर सावरकर यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. या रस्त्यांमुळे फक्त दळणवळण सुकर झालं नाही, तर रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि शेतीमाल वाहतुकीलाही बळकटी मिळाली आहे. स्थानिक पातळीवर संघर्ष करणाऱ्या अनेक कुटुंबांसाठी हा रस्ता म्हणजे आशेचा किरण आहे. ज्यांचं आयुष्य खड्ड्यांमध्ये आणि धुळीत अडकलेलं होतं त्यांच्यासाठी ही एक नवी संधी आहे, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासाची.

Devendra Fadnavis : संतोष देशमुखांच्या सुपुत्रीला मुख्यमंत्र्यांची सलाम ठोकणारी थाप 

मूलभूत सुविधा

माजी खासदार संजय धोत्रे, भाजपचे विद्यमान खासदार अनुप धोत्रे यांनी या भागासाठी सातत्याने निधी उपलब्ध करून दिल्याचं नमूद करत रणधीर सावरकरांनी त्यांचे आभार मानले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारने देखील ग्रामीण भागासाठी निधी मंजूर करत ‘विकास हेच उत्तर’ ही भूमिका अधिक ठामपणे मांडली आहे. या पायाभूत सुविधांमुळे अकोल्यातील तरुणाईला रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. शेतकऱ्यांचा माल बाजारापर्यंत पोहोचण्याचा वेळ आणि खर्चही कमी होणार आहे, असेही सावरकर म्हणाले. स्वातंत्र्यानंतर प्रथमच ग्रामीण शेतकऱ्याला सरकारदरबारी ठोस मदत मिळतेय, ही भावना यावेळी अनेक ग्रामस्थांनी मांडली. मदतीला उपकार नव्हे, तर कर्तव्य म्हणून स्वीकारणारी ही भूमिका सरकारची जबाबदारी लक्षात घेऊन राबवली जात आहे, हे निश्चितच उल्लेखनीय आहे.

अकोल्यासारखा मागास जिल्हा विकासाच्या नकाशावर उमटणार, अशी दशकांपासून अकोलेकरांची इच्छा आहे. रस्त्यांपासून सुरू झालेली वाटचाल शिक्षण, आरोग्य, रोजगार, वाहतूक या मूलभूत गरजांकडे वळताना दिसत आहे खरी. पण अजून बराच पल्ला गाठायचा असला तरी ‘विकासाच्या दिशेने पहिले पाऊल’ हे नक्कीच आश्वासक आहे. अकोल्याला हळूहळू का होईना, पण आता विकास बघायला मिळणार, हीच अपेक्षा सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाली आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!