महाराष्ट्र

Atul Londhe : शिंदेच्या काळात आर्थिक राजधानीत साचले भ्रष्टाचाराचे पाणी

Congress : पावसाचा इशारा असूनही प्रशासनाने डोळे बंद केसे?

Author

पावसाने महाराष्ट्रात हजेरी लावली असतांना पहिल्याच पावसांत अनेक शहर हे जलमय झाले आहेत. या पावसाचा फटका आर्थिक राजधानी मुंबईलाही मोठ्या प्रमाणात बसला आहे.

भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला मुसळधार पावसाने संकटात टाकले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले असून अनेक शहरं जलमय झाली आहेत. ठिकठिकाणी पाणी साचणे आता सामान्यच झाले आहे, पण आर्थिक राजधानी मुंबईसारख्या शहरातही पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी जलजमाव झाला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका मेट्रो स्टेशनमध्ये पाणी शिरल्याने मोठा वादळ उठले आहे, ज्यावर काँग्रेसकडून सुद्धा जोरदार टीका होत आहे.

मुंबईतील गेल्या पावसाच्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा शहराला साचलेल्या पाण्याच्या विळख्यात फसवले आहे. मुंबईची समृद्धी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची ओळख असणारे हे महानगर, युती सरकारच्या भ्रष्टाचार आणि अपार गैरव्यवस्थापनामुळे थेट संकटात सापडले आहे, असा घणाघात प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला. गोवंडी, वांद्रे, जुहू यांसारख्या महत्त्वाच्या भागांमध्ये सुद्धा जलप्रलयाचे दृश्य दिसले, पण तरीही या सगळ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Maharashtra : लाडक्या बहिणींसाठी आदिवासींच्या तिजोरीवर डल्ला 

तांत्रिक दोष उघड

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दहा वर्षांहून अधिक काळच्या कारकीर्दीत मुंबईच्या पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे झालेल्या विसंगतींचा फक्त वेध घेतला नाही, तर त्यावर ठोस कारवाई न होणे हा या सरकारचा मोठा अपयश असल्याचे अतुल लोंढे म्हणाले. हवामान खात्याने पूर्वच सावधगिरीचा इशारा दिला असताना बीएमसी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने योग्य ती तयारी का केली नाही, याचीही त्यांनी चौकशी केली. अशा वेळी, मुंबईत सर्वत्र पाणी साचलेले असताना अपूर्ण मेट्रो-3 प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले, यावरही अतुल लोंढे यांनी गंभीर टीका केली.

आचार्य अत्रे मेट्रो स्टेशनमध्ये पाणी शिरले, जेथे तांत्रिक दोष स्पष्ट दिसून आला. या स्टेशनमध्ये तीन प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याचे तीन दरवाजे असणे आवश्यक असताना, फक्त दोनच आहेत. अशा त्रुटींची तपासणी कोणत्या अधिकार्‍यांनी केली होती का? पावसाचा 40 मिमीचा साचा पडल्यानंतरही पाणी शिरु शकते, हे कुणालाही माहीत नव्हते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.मुंबईच्या जनतेच्या हितासाठी नव्हे, तर मंत्र्यांच्या शिष्टाचारासाठी बीएमसी अधिकारी कार्यरत आहेत असे आरोपही त्यांनी केले.

Akola Rain : आभाळ फाटलं, जनतेसाठी धावले दोन भाऊ

त्वरित सुधारणा गरजेची

शहर जलमय झाले असूनही कोणत्याही अधिकारी, ठेकेदार किंवा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई का झाली नाही, याचा शोध घ्यावा लागेल, असेही अतुल लोंढे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचार सहन करणार नाही, असे म्हटले होते, पण त्यानुसार कारवाई कोणावर झाली याचेही स्पष्ट उत्तर हवे, असे आवाहन त्यांनी केले.अखेर, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढू शकत नाहीत, त्यांना या सर्व घटना आणि भ्रष्टाचारासाठी स्पष्टपणे जबाबदारी स्वीकारावी लागेल, असेही अतुल लोंढे यांनी ठामपणे म्हटले. मुंबईच्या भविष्यासाठी आणि जनतेच्या सुरक्षेसाठी युती सरकारने त्वरित सुधारणा करावी, अन्यथा या प्रकारचीच संकटे येत राहतील, असा इशारा त्यांनी दिला.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!