महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : लाडकीचं प्रेम निवडणुकीपुरतेच

Mahayuti : एक योजना जिंकल्यावर दुसरी गमवावी लागेल

Author

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लाडकी बहिण योजनेतील कपातीवर टीका करत म्हणाले की ही योजना फक्त निवडणुकपुरती होती.

महायुती सरकारच्या बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा बदल झाला आहे. आठ लाख लाभार्थी महिलांच्या मासिक स्टायपेंडमध्ये कपात करण्यात आली आहे. कारण या महिलांना आधीपासूनच नमो शेतकरी महा-सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत होता. हा ओव्हरलॅपिंग फायदे थांबवण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. या निर्णयामुळे महायुती सरकारवर विरोधकांचा रोष वाढला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.

सपकाळ म्हणाले की, कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी ही म्हण आता बदलून निवडणुकीपुरता शेतकरी आणि मतांपुरती लाडकी बहीण अशी झाली आहे.सपकाळ म्हणाले की, सरकारने कर्जमाफीचे स्वप्न दाखवून मतं घेतली आणि सत्तेत आल्यानंतर कर्जमाफीऐवजी शेतकऱ्यांना पैसे भरा असा आदेश दिला. महिलांना दिलेल्या आश्वासनांवर पाणी फिरवत, सातत्याने त्यांना योजनेतून वगळण्याचे काम सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.

Nitin Gadkari : गडकरींचा रोडमॅप; टोलही स्मार्ट, रस्तेही फास्ट

महिलांचे स्वप्न उध्वस्त

काही लाभार्थी नमो शेतकरी योजनेद्वारे आधीच एक हजार मासिक लाभ घेत आहेत, त्यांना आता लाडकी बहीण योजनेतून केवळ 500 रुपये मिळतील. सुरुवातीला मिळणाऱ्या 1 हजार 500 रुपयाच्या तुलनेत ही रक्कम एकतृतीयांश झाली आहे.राज्य सरकारकडून सुरू असलेल्या पात्रता पडताळणी प्रक्रियेचा परिणाम योजनेच्या आकड्यांवरही स्पष्ट दिसत आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये 2 कोटी 63 लाख अर्ज प्राप्त झाले होते. मात्र फेब्रुवारीपर्यंत ही संख्या 2 कोटी 52 लाखांवर आली.

अंतिम स्टायपेंड फेब्रुवारी-मार्चमध्ये 2 लाख 46 हजरांवर स्थिरावला आहे. सरकारच्या नव्या घडामोडींमुळे सरकारला बचत होत असली, तरी हजारो महिलांचे स्वप्न उध्वस्त होत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व अर्जांची जिल्हास्तरावरून राज्य मुख्यालयात पडताळणी केली जात आहे. पात्रतेच्या निकषांवर परत छानणी प्रक्रिया सुरू आहे. जुलै 2024 मध्ये सुरू झालेली ही योजना, निवडणुकीच्या तोंडावर महिलांच्या पाठिंब्यासाठी प्रभावी ठरली होती.

Nagpur : बाबासाहेबांचे संविधान पोहोचणार घरोघरी

पात्रतेवरून वाद

योजना अंतर्गत विवाहित, विधवा, घटस्फोटित, सोडून दिलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना दरमहा 1 हजार 500 रुपये दिले जाते. या योजनेचा लाभ 21 ते 65 वयोगटातील महिलांना दिला जातो, व वार्षिक उत्पन्न मर्यादा अडीच लाख आहे.मात्र, एक महत्वाची अट म्हणजे कोणत्याही महिलेला सर्व योजनांचा मिळून एकूण मासिक लाभ 1 हजार 500 रुपयांच्या पुढे जाऊ नये, त्यामुळे संजय गांधी निराधार योजना किंवा नमो शेतकरी निधी मिळणाऱ्यांना लाडकी बहीण यादीतून वगळले जात आहे.

महिला सशक्तीकरणाच्या गाजावाजात सुरू झालेली लाडकी बहीण योजना आता शासनाच्या धोरणात्मक निर्णयांमुळे चर्चेत आहे. लाभार्थ्यांचे कपात, पात्रतेच्या नव्या अटी आणि विरोधकांचा रोष हे सर्व मिळून ही योजना सध्या राजकीय आणि सामाजिक वादाच्या केंद्रस्थानी आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!