महाराष्ट्र

कव्वाली वाला आला अन् शेर और शायरी वाला गेला 

नवीन Chief Election Commissioner वर काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान 

Author

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती सरकारच्या सोयीसाठी झाली आहे, असा आरोप विरोधक करत आहेत. काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी या नियुक्तीवर टीका केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या बैठकीत ज्ञानेश कुमार यांची भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी मावळते मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची जागा घेतली आहे. राजीव कुमार 18 फेब्रुवारी 2025 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.

ज्ञानेश कुमार यांच्या निवडीवर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे. विशेषतः महाराष्ट्र काँग्रेसने या नियुक्तीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य करत ज्ञानेश कुमार यांना ‘कव्वाली’ करणारा म्हणत टीका केली आहे.

नवे प्रदेशाध्यक्ष म्हणाले; सर्वांची नावे सांगितली, पण निवड माझी झाली

सरकारला पाहिजे तसे 

अतुल लोंढे म्हणाले की, शेर और शायरी वाला गेला आणि कव्वाली वाला आला, अशा प्रकारची ही नियुक्ती आहे. मुख्य निवडणूक आयुक्त पदाच्या नियुक्तीसाठी पाच नावांची यादी होती. हे पाचही नाव सरकारप्रमाणे आणि सरकारला पाहिजे तसे काम करतील, असा थेट आरोप काँग्रेसचा असल्याचे अतुल लोंढे म्हणाले.

मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करण्याच्या प्रक्रियेबाबत एक महत्त्वाची याचिका सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर काय होऊ शकते, याची कोणालाही कल्पना नाही. त्यामुळे नियुक्तीची ही बैठक पुढे ढकलली पाहिजे होती. परंतु तडका फडके मध्ये ही नियुक्ती करण्यात आली. 19 फेब्रुवारी रोजी या संबंधित सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीला दुर्लक्षित करण्यात आले आहे, असे अतुल लोंढे म्हणाले.

ढय्या लागली.. Parinay Fuke यांच्याशी दगा करणाऱ्यांना आता शिक्षा

प्रक्रिया थांबवण्याची मागणी

ज्ञानेश कुमार यांना निवडणाऱ्या समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा समावेश होता. मात्र, राहुल गांधींनी या प्रक्रियेचा तीव्र विरोध केला. त्यांनी ही नियुक्ती सध्या प्रलंबित ठेवण्याची मागणी केली होती.

मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करण्याच्या प्रक्रियेबाबत एक महत्त्वाची याचिका सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. राहुल गांधी यांनी मत नोंदवताना स्पष्ट सांगितले की, “सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत ही निवड प्रक्रिया पुढे ढकलली पाहिजे, असे अतुल लोंढे म्हणाले.

काँग्रेसमध्ये खळबळ

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाल्याने पक्षाच्या अंतर्गत राजकारणात खळबळ उडाली आहे. पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांना हा निर्णय अनपेक्षित वाटला आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय गणितांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सपकाळ यांना संधी दिल्याने नव्या नेतृत्वाला चालना मिळेल, असे मत काहीजण व्यक्त करत आहेत. पण अनेक दिग्गज नेते या निर्णयावर नाराज असल्याचे संकेत मिळत आहेत.

सपकाळ यांच्या निवडीमुळे काँग्रेसमध्ये नव्या उर्जेची लाट येण्याची शक्यता आहे. मात्र, पक्षातील जुन्या आणि प्रभावशाली नेत्यांचे त्यांना कितपत सहकार्य मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष आहे. आगामी काळात काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी वाढण्याची शक्यता असून, हर्षवर्धन सपकाळ हे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कोणती रणनीती आखतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!