देश

Rahul Gandhi : भारतीय सशस्त्र दलांचा अभिमान आहे

Opration Sindoor : कुंकू पुसल्याच्या वेदनेला क्षेपणास्त्रांचं उत्तर

Author

भारताने पहलगाम हल्ल्याचा सूड घेत पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर मोहीम अंतर्गत हल्लाबोल केला आहे. या कारवाईवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधींनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.

काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरले आहे. निर्दयीपणे नवविवाहित जोडप्यांवरही गोळ्या झाडण्यात आल्या. महिलांसमोर त्यांच्या पतीची हत्या करण्यात आली. कपाळावरचं कुंकू अक्षरशः पुसलं गेलं. या क्रौर्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या संयुक्त कारवाईत 7 मे रोजी पहाटे 1.44 वाजता एकाच वेळी नऊ ठिकाणांवर क्षेपणास्त्र आणि एअर स्ट्राईकच्या माध्यमातून दहशतवाद्यांचे बिळं उद्ध्वस्त करण्यात आले. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख तळ असलेल्या बहावलपूरचाही या कारवाईत समावेश होता.

कारवाईत 62 दहशतवादी आणि त्यांच्या हँडलर्सचा खात्मा झाला आहे. ही संख्या आणखी वाढू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. दहशतवाद्यांना सुटका नाही. ते जिथेही असतील, भारत पोहोचेलच, असा ठाम संदेश लष्कराने दिला आहे. विशेष म्हणजे या कारवाईला ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्यात आलं. जे त्या नवविवाहित स्त्रियांच्या कपाळावरून पुसल्या गेलेल्या कुंकवाचं प्रतीक ठरतं. पहलगाममधील हल्ल्यात ठार झालेल्या किमान 26 निष्पाप पर्यटकांच्या मृत्यूचा बदला म्हणून ही कारवाई राबवण्यात आली. या कारवाईनंतर संपूर्ण देशभरातून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.

Operation Sindoor : भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक, दहशतवाद्यांच्या अड्ड्यांचा खात्मा

आकाशात अग्नीकवच पुन्हा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, आम्हाला आमच्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे. पहलगाममधील क्रौर्याचं फळ त्यांना भोगावंच लागेल. कोणत्याही दुसऱ्या मार्गाने नाही, तर याच कठोर मार्गाने. जे घडलं ते भारतासाठी अजिबात स्वीकारार्ह नाही. त्याची किंमत त्यांना चुकवावीच लागेल. हे लक्षात राहील अशीच शिक्षा होईल. या निर्णायक क्षणी विरोधक म्हणून नाही, तर भारतीय म्हणून आम्ही सरकारच्या पाठीशी शंभर टक्के आहोत, असं ठाम मत राहुल गांधी यांनी मांडलं. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीदेखील लष्कराच्या धाडसाचं आणि निर्धाराचं कौतुक केलं.

पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व प्रकारच्या दहशतविरुद्ध भारताचं एक अटल राष्ट्रीय धोरण आहे. आम्ही आपल्या सशस्त्र दलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असं काँग्रेसने स्पष्ट केले आहे. या हल्ल्याची व्याप्ती पाहता अनेकांना कारगिल युद्धाची आठवण झाली. त्या वेळी भारतीय तोफखान्याने आकाशात अग्नीकवच निर्माण केलं होतं. दोन लाखांहून अधिक तोफगोळे, बॉम्ब आणि रॉकेट्स पाकिस्तानच्या तळांवर झडप घालण्यासाठी वापरण्यात आले. 300 तोफा, मोर्टार आणि मल्टिपल बॅरल रॉकेट लॉन्चर्सद्वारे दररोज पाच हजारांहून अधिक स्फोटके डागण्यात आली. टायगर हिलसारख्या दुर्गम भागावर नियंत्रण मिळवण्यासाठी दिवसाला तब्बल नऊ हजार गोळ्यांचा वर्षाव करण्यात आला होता.

Bacchu kadu : सरकार तीन माकडांची, धुरा सांभाळताय राज्याची

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!