महाराष्ट्र

Ranjit Kamble : शेतकऱ्यांच्या नशिबाचा कागद कोरा 

Congress : सातबारावरच्या जखमा, आश्वासनांच्या मिठ्या 

Share:

Author

सरकारने दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन आता विस्मरणात गेलंय का? असे विचारत रणजित कांबळेंनी सरकारच्या समितीच्या निर्णयावर सडकून टीका करत सरसकट कर्जमाफीची ठाम मागणी केली आहे.

सत्तेचा साज चढताच शेतकऱ्यांच्या व्यथा विसरले?महायुती सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीतील गाजलेलं आश्वासन म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी, हे आता इतिहासजमा झालंय का? असे काँग्रेसचे माजी मंत्री रणजित कांबळे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत म्हटले. या प्रश्नाने आता राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी ‘नियत’ लागते, समित्या नाही, असेही कांबळे म्हणाले.

वर्ध्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रणजित कांबळेंनी सरकारच्या भूमिकेवर घणाघाती टीका केली. महामार्गांचे भूमिपूजन, प्रकल्पांच्या घोषणा यासाठी सरकारकडे हजारो कोटींची व्यवस्था असते. पण जे शेतकऱ्यांना वाचवतील अशा कर्जमाफीसाठीच सरकारकडे पैसे नसल्याचा देखावा केला जातो, असा घणाघात त्यांनी केला. कांबळे यांनी असंही म्हटलं की, समित्या स्थापून वेळकाढूपणा करण्यापेक्षा थेट सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी, हीच खरी न्याय्य आणि तातडीची गरज आहे.

भावनांशी खेळाल, तर खैर नाही

काँग्रेसने वेळोवेळी सरकारला त्यांच्या आश्वासनांची आठवण करून दिली आहे. हीच जनता तुम्हाला सत्तेवर आणते, आणि सत्तेत येताच त्यांच्याच पाठीवर वार का? असा सवाल काँग्रेसतर्फे उपस्थित करण्यात आला. रणजित कांबळेंनी बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचाही संदर्भ देत सांगितलं की, हे आंदोलन केवळ सरकारला जागे करण्यासाठी होतं. सात दिवस उपोषण करत असताना त्यांची प्रकृती बिघडली, तरीही सरकारने गंभीरतेने घेतलं नाही, हे अत्यंत लाजिरवाणं आहे.

Nagpur : स्थानिक निवडणुकींआधी संघ-भाजप एकत्र

गप्प बसणार नाही

कांबळेंनी याआधी झालेल्या आंदोलनांची आठवण करून दिली. “पूर्वीही विविध प्रश्नांवर समित्या स्थापन केल्या गेल्या, पण त्यांचं पुढे काय झालं? फाईली धुळ खात पडून राहिल्या, अशा शब्दांत त्यांनी सरकारला नौटंकी म्हणत हल्लाबोल केला. या परिस्थितीत काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की, सरसकट कर्जमाफीशिवाय पर्याय नाही.

सरकारने जर अजून वेळकाढूपणा केला, तर शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आणि त्यावेळी परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता काँग्रेसने व्यक्त केली आहे. कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. नाहीतर जनता मौन धरणार नाही. काँग्रेस त्यांच्यासोबत खंबीरपणे उभी राहील आणि सरकारला जागं करूनच थांबेल, असा इशारा रणजीत कांबळे यांनी दिला.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!