महाराष्ट्र

Sanjay Meshram : काँग्रेस आमदाराकडून मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने

Nagpur : संजय मेश्रामांनी देवेंद्र फडणवीसांना दिली मानाची पावती

Author

नागपूरमध्ये झालेल्या सेवा हक्क दिनाच्या कार्यक्रमात काँग्रेस आमदार संजय मेश्राम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खुलेआम कौतुक केले. फडणवीस यांच्या सेवाभावाला दाद देत मेश्राम यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन सकारात्मक संदेश दिला.

नागपूरच्या राजकारणात जिथे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये कायमच वादाचे सूर घुमत असतात, तिथे उमरेडचे काँग्रेस आमदार डॉ. संजय मेश्राम यांनी एका नवा आदर्श निर्माण केला. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या सेवा हक्क दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल त्यांनी मोकळ्या मनाने स्तुती केली.

डॉ. मेश्राम यांनी सांगितले की, नागरिकांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत फडणवीस यांनी घेतलेला पुढाकार अत्यंत गौरवास्पद आहे. राजकारणाच्या पलिकडे जाऊन, चांगल्या कामाची प्रशंसा करावी अशी लोकशाहीतील संस्कृती त्यांनी दाखवून दिली.

MHT – CET : परीक्षेत गोंधळाचा भडका, मुख्यमंत्र्यांकडे धडक

सन्मानाचा क्षण

सेवा हक्क दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात आमदार मेश्राम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सेवा क्षेत्रातील कटिबद्धतेचे खुलेआम कौतुक केले. त्यांनी म्हटले की, सेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी फडणवीस यांनी केलेले प्रयत्न अत्यंत उल्लेखनीय आहेत. नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सेवा प्रभावीपणे मिळाव्यात यासाठी घेतलेला पुढाकार हा त्यांच्या संवेदनशील नेतृत्वाचा उत्तम दाखला आहे.

बास्केटबॉल संघटनेच्या काळात देखील फडणवीस यांच्या सेवा क्षेत्राबाबतची तळमळ मी जवळून पाहिली आहे, असे सांगत मेश्राम यांनी आपल्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. ही आठवण सांगताना त्यांच्या आवाजात अभिमानाचा आणि आदराचा ठसा स्पष्टपणे जाणवत होता.

Amaravati : मोर्शीच्या संत्रा शेतकऱ्यांचा फसवणुकीवर संताप

लोकशाहीची खरी परीक्षा

डॉ. संजय मेश्राम यांनी आपल्या भाषणात लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरही भाष्य केले. त्यांनी स्पष्ट केले की, लोकप्रतिनिधींना प्रत्येक दिवस ही एक परीक्षा आहे. एखाद्या अधिकाऱ्याला निवडून आल्यावर दीर्घकाळ पदावर राहता येते. मात्र लोकप्रतिनिधींना सतत जनतेसमोर आपली कामगिरी सिद्ध करावी लागते.

शासनाच्या विविध सेवा, योजना आता जनतेपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचत असून सेवा हक्क कायद्यामुळे नागरिकांमध्ये जागरूकतेचा सकारात्मक परिणाम जाणवतो आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवेचा उत्तम अनुभव नागरिकांना द्यावा, असेही मेश्राम यांनी ठामपणे सांगितले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!