महाराष्ट्र

सुरेश धस यांचा दुटप्पीपणा; Vijay Wadettiwar यांची फटकेबाजी

काँग्रेस नेत्यानं Social Media प्लॅटफॉर्मवर टाकला पुरावा

Author

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांच्या दुटप्पी भूमिकेबद्दल विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घणाघाती टीका केली आहे.

पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सुरेश धस यांनी पीडित कुटुंबाला पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे पोलिसांवर गुन्हे दाखल होऊ नयेत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. धस यांच्या या भूमिकेवरून वडेट्टीवार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाने मोठा वाद निर्माण झाला आहे. पोलिसांनी त्यांना बेदम मारहाण केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. सूर्यवंशी परिवाराला न्याय मिळावा, यासाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सुरेश धस सहभागी झाले होते.

आमदार धस यांनी मोर्चामध्ये सूर्यवंशी कुटुंबाच्या दुःखाला आपला पाठिंबा दिला. मात्र, काही दिवसांनंतर त्यांनी पोलिसांवर गुन्हे दाखल होऊ नयेत, अशी मागणी केली. यावर वडेट्टीवार यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. सुरेश धस यांचा व्हिडीओच त्यांनी ट्विट केला. सुरेश धस हे एकीकडे कुटुंबाच्या दुःखात सहभागी होतात. दुसरीकडे पोलिसांना क्लीन चिट देतात. हेच त्यांचे दुटप्पी राजकारण आहे. एका आईने आपला मुलगा गमावला. त्याचा न्याय मागायचा की, पोलिसांना फक्त समज देऊन सोडायचे. हा कुठला न्याय? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.

शिवसेना गटांमधील स्नेहभोजनाचे Political वादळ

न्यायाची मागणी

सूर्यवंशी प्रकरणानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. आता सुरेश धस यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यांच्या हेतूवरही शंका घेतली जात आहे. भाजप नेत्यांची पोलिस दलावर अनावश्यक कृपा का? पोलिसांवर गुन्हे दाखल न करण्याच्या मागणीमुळे भाजपवर आता टीका केली जात आहे. पोलिसांना आता पाठीशी घालण्यात येत असल्याचा आरोप होत आहे.

विजय वडेट्टीवार यांनी सुरेश धस यांना चोख प्रत्युत्तर देताना त्यांच्या दुटप्पी भूमिकेचा वडेट्टीवार यांनी पर्दाफाश केला. जर कोणत्याही सामान्य नागरिकावर अन्याय होत असेल, तर आम्ही त्याला न्याय मिळवून देऊ. पण भाजप नेते मात्र पोलिसांचे संरक्षण करण्यातच धन्यता मानत आहेत, असे ते म्हणाले. धनंजय मुंडे यांच्यावर नेहमी टीका करणारे सुरेश धस यांनी सरपंच देशमुख हत्या प्रकरणात ‘आका’ असा उल्लेख केला. यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे मुंडे यांच्यावर आरोप केले होते. अशात धस यांनी पोलिसांना संरक्षण दिल्याने या विषयाला कलाटणी मिळाली आहे. धस यांना खरंच न्याय द्यायचा असता, तर त्यांनी पोलिसांविरोधात ठाम भूमिका घेतली असती, असे वडेट्टीवार म्हणाले.

मर्यादा ओलांडाल तर परिणाम भोगाल ! Devendra Fadnavis यांचा दोघांनाा इशारा

न्यायासाठी संघर्ष

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला अजूनही न्याय मिळालेला नाही. त्यांचा मृत्यू पोलिस कोठडीत झाला. त्यामुळे हा विषय अधिक गांभीर्याने घेतला पाहिजे, अशी मागणी विरोधक करीत आहेत. यावर आता सरकार काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजप आमदार सुरेश धस यांच्या या भूमिकेमुळे पक्षावरही दबाव वाढला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कसा होतो आणि धस यांची भूमिका यात किती महत्त्वाची ठरते, हे पाहणे गरजेचे ठरेल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!