महाराष्ट्र

Devendra Fadnavis : सूडाचे राजकारण लोकशाहीसाठी घातक

Supriya Sule : फडणवीसांचा गंभीर इशारा कटकारस्थानाच्या पार्श्वभूमीवर

Author

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत धक्कादायक गौप्यस्फोट करत सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावर थेट आरोप केले. ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत धक्कादायक दावे करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्यावर थेट आरोप केले आहेत. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे प्रकरणात ब्लॅकमेलिंगचा कट रचल्याचा दावा करत फडणवीस यांनी सांगितले की, या कटात सहभागी आरोपींशी सुळे आणि पवार थेट संपर्कात होते. या आरोपांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट शब्दांत सांगितले की, जयकुमार गोरे यांच्यावरील आरोपांचा तपास सुरू असताना आरोपी महिलेसह इतर दोन व्यक्तींच्या मोबाईल संवादाची तपासणी करण्यात आली. यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. विशेषतः आरोपींनी सुळे आणि पवार यांच्याशी थेट संपर्क साधल्याचा पुरावा मिळाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या घटनाक्रमानंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असताना या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे.

Sudhir Mungantiwar : जो गलतियां करेगा वो जेल में जायेगा

प्रकरणातील नेक्सस उघड

फडणवीस यांनी या प्रकरणात नेक्सस असल्याचा उल्लेख केला आहे. आरोपी महिला, पत्रकार तुषार खरात आणि अनिल सुभेदार यांनी मिळून जयकुमार गोरे यांना ब्लॅकमेल करण्याचा कट रचल्याचे पुराव्यानिशी स्पष्ट झाले आहे. त्यांचा संपूर्ण कट रचण्याचा संवाद व्हॉट्सॲप चॅट आणि दीडशेहून अधिक कॉल रेकॉर्ड्समधून समोर आला आहे. हा ब्लॅकमेलिंगचा कट असल्याचे ठोस पुराव्यांसह सिद्ध झाले असून, पोलीस विभागाने सखोल तपास सुरू केला आहे.

माजी प्रशासकीय अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी या तिन्ही आरोपींशी शंभरहून अधिक वेळा संपर्क साधल्याचे आढळले आहे. आरोपींकडून जयकुमार गोरे यांचे व्हिडीओ मिळाल्यानंतर त्यांनी हे व्हिडीयो पुढे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना पाठवल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व संवादांची पडताळणी सुरू आहे. राज्यातील राजकीय वर्तुळात हा मुद्दा अत्यंत गंभीर बनला आहे.

Anna Bansode : महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष पदावर राष्ट्रवादीचा झेंडा

व्यक्तीगत हल्ला

विधानसभेत बोलताना फडणवीस यांनी ही संपूर्ण घटना राजकीय वैराचा घृणास्पद प्रकार असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, गोरे यांच्यावरील आरोपांचा तपास सुरू असतानाच हे कटकारस्थान समोर आले आहे. राजकीय स्पर्धा असणे वेगळे, पण कुणाला पूर्णपणे संपवण्याच्या हेतूने कट रचला जात असेल, तर तो अत्यंत गंभीर आहे.

संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि यात सहभागी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. आता या प्रकरणाचे पुढील परिणाम काय होतील, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!