महाराष्ट्र

Navneet Rana : मोदी-फडणवीसांमुळेच विमान झेपावले आकाशी

Amravati Airport : माजी खासदार नवनीत राणा यांनी सांगितला प्रवास

Author

देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने अमरावती विमानतळाचे स्वप्न साकार होत आहे.

अमरावतीकरांचे हवाई प्रवासाचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरले आहे. विदर्भाच्या या महत्त्वाच्या शहरात आता विमानतळ पूर्णतः कार्यान्वित होण्यासाठी सज्ज आहे. या नव्या दालनामुळे अमरावतीतील अर्थव्यवस्था, व्यापार, पर्यटन आणि हवाई संपर्काला मोठी चालना मिळणार आहे. माजी खासदार नवनीत राणा यांनी द लोकहित लाइव्ह सोबत बोलतांना सांगितले की अमरावती विमानतळ हे एक मोठं स्वप्न आहे. हे स्वप्न देवेंद्र फडणवीस आणि मोदी सरकार यांच्या पुढाकाराने यशाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.

अमरावतीसाठी 30 मार्च हा एक ऐतिहासिक दिवस ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने पहिल्यांदाच एटीआर-72 प्रकारच्या विमानाचे चाचणी लँडिंग यशस्वीरीत्या पार पडले. यामुळे प्रादेशिक हवाई संपर्काच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकला. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अमरावतीच्या भूमीवर हे ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला.

Prakash Ambedkar : फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेवर घाला

विदर्भाच्या विकासाला वेग

विमान झेपावण्याचे स्वप्न साकार करण्यामागे माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे प्रयत्न आहेत. त्यांनी अमरावतीकरांसाठी हवाई सेवा सुरू करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सतत पाठपुरावा करत हा ऐतिहासिक क्षण घडवून आणला आहे. 2014 मध्ये वर्षा नायर या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळापासूनच नवनीत राणा यांनी या प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू केला होता. मात्र, त्यांना मोठ्या राजकीय अडथळ्यांना सामोरे जावे लागले, असे त्यांनी सांगितले.

नवनीत राणा यांनी सांगितले की उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात राज्य सरकारकडून निधी मिळण्यात अडथळे आले. पण नवनीत राणा यांनी थेट मोदी सरकारकडे धाव घेतली. नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे पहिल्या टप्प्यात तब्बल 75 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी सतत पाठपुरावा केला. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळाले.

Vidarbha : भंडारा जिल्ह्यामध्ये आता कॉर्पोरेटची निवडणूक

महायुतीची साथ

महायुती सरकार सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिळून या प्रकल्पाला अधिक गती दिली. या संपूर्ण प्रक्रियेत रवी राणा यांनी राज्य पातळीवर पाठपुरावा केला, तर नवनीत राणा यांनी केंद्र सरकारमध्ये हे काम पुढे नेले. अशा प्रकारे दोघांच्या समन्वयाने आणि धडपडीने अमरावती विमानतळाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला.

अमरावती हे वेगाने विकसित होणारे शहर आहे. आता ते हवाई मार्गाने जोडले जाणे हा येथील नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. या विमानतळामुळे प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होईल. उद्योग, व्यापार आणि पर्यटनाच्या क्षेत्रात नवनवीन संधी निर्माण होतील. हवाई सेवेमुळे शैक्षणिक आणि वैद्यकीय पर्यटनालाही चालना मिळणार आहे, जे या भागातील विकासाला गती देईल.

Vijay Wadettiwar : इतिहास अन् परंपरेच्या वादाचा सूड उठला वैयक्तिक जीवनावर 

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!