महाराष्ट्र

गडचिरोलीसाठी State Government मधील दोन्ही मंत्री ॲक्शन मोडमध्ये

नक्षलवादावर निर्णायक वार करण्यासाठी आता Ashish Jaiswal देखील मैदानात

Author

गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भर देत आहेत. त्यानंतर मंत्री आशिष जयस्वाल यांनीही गडचिरोली साठी पुढाकार घेतला आहे. नक्षलवाद संपविण्यासाठी दोन्ही नेते ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. 

गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात संवेदनशील भागांपैकी एक मानला जातो. गेल्या कित्येक दशकांपासून येथे नक्षलवादाचे सावट आहे. मात्र आता ही परिस्थिती बदलण्याचा जोरदार प्रयत्न राज्य सरकार करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीवर विशेष लक्ष ठेऊन आहेत. त्यानंतर आता मंत्री आशिष जयस्वाल यांनीही गडचिरोलीच्या विकासासाठी पाऊल उचललेले आहे. नक्षलवादाच्या संपूर्ण निर्मूलनासाठी फडणवीस आणि जयस्वाल हे दोन्ही नेते अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांच्या ठोस धोरणांमुळे गडचिरोली जिल्ह्याला विकासाचा नवा वेग मिळणार असल्याची आशा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीसाठी मोठे पाऊल उचलले आहेत. तेथील सुरक्षाव्यवस्थेत लक्षणीय सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिस दलाच्या मजबुतीकरणापासून ते पायाभूत सुविधांच्या विकासापर्यंत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. गडचिरोलीतील जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे आमचे ध्येय आहे. नक्षलवादाचा पूर्णतः नायनाट करणे हीच आमची प्राथमिकता आहे, असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले आहे.

भविष्यात Raj Thackeray ठरू शकतात Politics मधील गेम चेंजर

वार्षिक खर्चाचा आढावा

मंत्री जयस्वाल गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वार्षिक योजना बैठकीला उपस्थित होते. यावेळी, 2024-25 अंतर्गत 11 फेब्रुवारी 2025 पर्यंतच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. महायुती सरकारच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट होत आहे. त्यादृष्टीने वन विभाग, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, जलसंधारण आणि मानव विकास यांसारख्या विभागांशी संवाद साधून मंत्री जयस्वाल यांनी माहिती घेतली.

मुख्यमंत्र्यांनंतर आता मंत्री आशिष जयस्वाल यांनीही गडचिरोलीच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे. ते विशेषतः शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि उद्योग क्षेत्रात मूलभूत सुधारणा करण्याच्या प्रयत्नांत गुंतले आहेत. आशिष जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे की, गडचिरोलीच्या जनतेसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्याशिवाय नक्षलवाद संपणार नाही. म्हणूनच आम्ही नवीन औद्योगिक धोरण, कृषी सुधारणा, तसेच पर्यटनाला चालना देण्यावर भर देत आहोत.

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा होणार सफाया; Government कठोर भूमिकेत 

कंपनी, पर्यटन स्थळांची भेट 

आशिष जयस्वाल यांनी गडचिरोलीतील चामोशी तालुक्याच्या कोनसरी येथील लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी या कंपनीला 12 फेब्रुवारी रोजी भेट दिली. यावेळी कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधून जयस्वाल यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल, सहाय्यक उपाध्यक्ष साईकुमार, व्यवस्थापक कृष्णा रेड्डी, व्यवस्थापक अमित काळे, सहाय्यक व्यवस्थापक गुप्ता आणि अभियंता सौरभ मोरे आदी उपस्थित होते.

गडचिरोलीतील वन पर्यटनाला चालना देण्यसाठी संयुक्त वनव्यवस्थापन समिती आणि गडचिरोली वन विभागामार्फत मागील तीन वर्षापासून गुरवडा नेचर सफारी सुरू करण्यात आली आहे. आशिष जयस्वाल यांनी 13 फेब्रुवारी रोजी या गुरवडा नेचर सफारीला भेट देऊन जंगल सफारी केली. सफारी दरम्यान नारळी गोटा, पुरातन वस्तू, पातर गोटा, अस्वल हुडकी गुफा, ढोली गोटा आणि वाघडोह परिसराची पाहणी केली. पर्यटकांसाठी जंगलातील व्हिव पॉईंट्ससह पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि अडचणींबाबत जयस्वाल यांनी वन विभागाकडून माहिती घेतली.

महामार्गांच्या जाळ्यात Maharashtra राज्याला ठेवले अग्रसर

विकासाचे पर्व

गडचिरोलीच्या वन पर्यटन वाढीच्या दृष्टीने वन विभागाला महायुती सरकारच्या माध्यमातून अधिक निधी उपल्बध करून पर्यटनाच्या वृद्धीसाठी कायम प्रयत्नशील आहे. यातून स्थानिकांना अधिकाधिक रोजगार निर्माण व्हावा यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील आहे.

गडचिरोलीत अनेक वर्षांपासून असलेली अस्थिरता दूर करून जिल्ह्याचा नवा चेहरा घडविण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री आशिष जयस्वाल यांनी केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली लवकरच नक्षलवादमुक्त होईल आणि विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करेल, अशी आशा स्थानिक नागरिकांना वाटत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!