
19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन पार पडला. या सोहळ्यापेक्षा अधिक लक्ष वेधून घेतलं ते शाब्दिक चकमकींनी. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेनंतर, मुख्यमंत्र्यांनीही त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले.
शिवसेनेचा 59 वर्धापन दिन ‘शब्दांच्या शस्त्रयुद्धाने’ गाजला. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका करताना असा इशारा दिला की, जर तुम्ही शिवसेनेचा ब्रँड पुसणार असाल, तर महाराष्ट्राच्या मातीवरून तुमचं नाव पुसून टाकू. या ठिणगीवरून राजकारणात खळबळ उडाली आणि प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकेला ‘बोलबच्चन’ अशा नावानेच झिडकारले. जळगाव दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी स्पष्टपणे म्हटलं, बोलबच्चनांना मी उत्तर देत नाही.
एकाच वाक्यात टीका आणि उपहासाचा सुर मिसळत त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख वारंवार ‘बोलबच्चन’ असा करत टोमणे मारले. जे राज्याच्या मनात आहे तेच मी करतो, असंही ते म्हणाले.मनसे आणि ठाकरे गट यांच्यात संभाव्य युतीबाबत उद्धव ठाकरे यांनी ‘मराठी माणसाची ताकद एकवटू नये म्हणून मालकांचे नोकर भेटीगाठी घेतात’ असा आरोप केला होता. यावरही फडणवीसांनी तितक्याच थेट भाषेत उत्तर दिलं ‘हे सगळे बोलबच्चन आहे. त्यांना मी उत्तर देत नाही.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा 59 वर्धापनदिन गुरुवारी (19 जून रोजी) मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.

Chandrashekhar Bawankule : टोमण्यांचं आयुष्य जगणाऱ्यांना महाराष्ट्र ओळखतो
मालकांचे नोकर कोण?
परंतु हा कार्यक्रम केवळ उत्सवाचा नव्हता तो सत्ताधाऱ्यांवर शब्दांचा मारा करणारा एक घणाघात होता. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर टीका करत, भाजप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला. मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून काहीजण हॉटेलांमध्ये गुप्त गाठीभेटी घेत आहेत, असा स्पष्ट आरोप करत उद्धव ठाकरेंनी राजकीय भोंगळ कारस्थानांची पोलखोल केली.
हे त्यांच्या मालकांचे नोकर आहेत, असं म्हणत त्यांनी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख खूपच टोचक्यापणे केला.कम ऑन, किल मी पण येताना ॲम्ब्युलन्स घेऊन या. येताना सरळ याल पण जाताना आडवे व्हाल, हा डायलॉग फेकून उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात भावनिकतेचा आणि जोशाचा परिपूर्ण मेळ घातला. नेत्यांची पळवा-पळवी, पक्षाची फोडाफोड, आणि खोट्या आश्वासनांच्या राजकारणावरही त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर घणाघात केला. जे राज्याच्या मनात आहे तेच मी करेन, असं सांगत त्यांनी आपली राजकीय भूमिका ठामपणे मांडली.
Amravati : कृषी समितीच्या माजी संचालकाची गळफास घेऊन आत्महत्या